Maharashtra Flood: नाशिक येथे मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरून पाणी वाहत आहे.
सततच्या पावसामुळे सोलापूर येथील सीना नदीने इशारा पातळी गाठली असून भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे. नांदेड जिल्ह्यातही गोदावरी नदीला अधिकचा विसर्ग करण्यात आल्याने सखल भागाल पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्यात एनडीआरएफच्या १८ आणि एसडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईसाठी दोन तुकड्या कार्यरत आहेत.
तेलबियांची नासाडी; अतिवृष्टीमुळे ८६ कोटी किलो सोयाबीनला फटका बसल्याचा अंदाज
नाशिक शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडून काढल्याने रविवारी गोदावरी, दारणा, उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. एकाचवेळी अनेक धरणांमधून केलेल्या हजारो क्युसेक्स विसर्गामुळे गोदावरीला चालू हंगामातील सर्वांत मोठा पूर आला. गोदाघाटावरील दुतोंड्या मारुती बुडून रामसेतू पूलदेखील यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला. परतीच्या या पावसाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, लहान-मोठी ३२ जनावरे दगावली आहेत. याशिवाय १४७ घरांची पडझड झाली. शेतीचे अतोनात नुकसान झाले.
मराठवाड्यात रविवारीही पावसाचा कहर कायम होता. यामुळे येथील पूरस्थिती बिकट झाली आहे. विभागात १८९ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडल्याने नदीकाठची गावे आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे. गोदाकाठच्या ५० गावांशी संपर्क तुटला आहे. जवळपास २० लाख हेक्टरवरील पिके पाण्यात आहेत.
Uddhav Thackeray: पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी
सरसकट पंचनामे
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनू लागलेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करीत आहे की नाहीत, हे तपासून पाहा. यासाठी प्रत्यक्ष संबंधित ठिकाणांना भेट द्या, असे निर्देश. सरसकट पंचनामे करा. कुठेही नियमावर किंवा कायद्यावर बोट ठेवून लोकांना त्रास होईल, अशी वर्तणूक नको, अशा सूचना
मुंबई पोलिस कॉन्स्टेबलच्या मृत्यूबाबत चार महिन्यांनी समोर आले धक्कादायक रहस्य; कारण जाणून थक्क व्हाल
पालघरमध्ये आज शाळा, कॉलेजांना सुट्टी
पालघर : पालघर जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज, सोमवारीही ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आल्याने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या, तसेच खासगी शाळा, शासकीय आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. मात्र शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी कार्यरत राहावे, असे निर्देश त्यांनी दिले आहे.
२४ तासांतील आकडेवारी…
मुंबई शहर—१२०.८ मिमी
मुंबई उपनगर—८३.३ मिमी
छत्रपती संभाजीनगर—११०.३ मिमी
नाशिक—७६.६ मिमी
अहिल्यानगर—८१.८ मिमी

