राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये तर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रावर मोठं आसमानी संकट ओढावलेलं आहे. राज्यात मान्सूनचा कालावधी आता संपत आलेला असताना पावसाने पुन्हा कमबॅक केलं आहे. या भयावह पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हाहाकार माजवला आहे. अनेक संसार, घरदार उद्ध्वस्त केली आहेत. अनेक गावं भकास केली आहेत. अनेक स्वप्न वाहून नेली आहेत. हा रौद्र पाऊस आता तरी थांबेल अशी आशा असताना त्याने पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढच्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनदेखील सतर्क असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
उद्या 6 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या पावसाला सुरुवात देखील झाली आहे. या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर उद्यासाठी रेड अलर्ट आहे. पालघर जिल्ह्याला जास्त पावसाचा धोका आहे. कारण पालघर जिल्ह्याला पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार, कोयना धरणाचे दरवाजे उघडले
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने उद्या अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटावरून ३ फुटापर्यंत उघडून २७,९०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३०,००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना नदीवरील मुळगाव ब्रिज पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा