राज्यात सध्या अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने राज्य सरकारसह…केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती…डबघाईला आली असल्याने केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे.नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिली नसल्याने….सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी अशी मागणीही एकनाथ खजसेंनी केलीय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या नेत्यांवर देखील टीका केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना त्यावर सरकार जाहिरातबाजी करत आहे. या जाहिरात बाजीचा हव्यास का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.