महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Chandrapur Rain Update: चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Solapur Rain: मराठवाड्यात तुफान पाऊस; सीना नदीला पूर, सोलापूर-पुणे महामार्ग बंद; पुढील तीन दिवस धोक्याचे
शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरू असलेल्या शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेपर्यंत घरी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात अथवा धोका टाळता येईल.
कापूस, भात पिके संकटात..
कृषीक्षेत्रावर देखील या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोर पकडल्यामुळे नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र जलमय झाली आहेत. परिणामी कापूस व भात यांसारखी मुख्य हंगामी पिके गंभीर संकटात सापडली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, सरकारला नको नको ते बोलले
पालकमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके आज स्वतः चंद्रपूरमध्ये दाखल झाले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिमूर व वरोरा तालुक्यातील शेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पिकांचे जवळपास 80 टक्के नुकसान झाल्याचे दृश्य त्यांच्या भेटीत स्पष्ट दिसून आले. शेतकरी व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही पालकमंत्री उईके यांनी दिले.
