Maharashtra Politics : मंत्री हसन मुश्रीफ यांनी “अरुण डोंगळे यांच्या आगमनाने पक्षाला शंभर हत्तींचं बळ मिळालं आहे. आगामी महापालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.” असं सांगितलं
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर परिणाम
डोंगळे यांचा पक्षप्रवेश केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-भुदरगड तालुक्यांपुरता मर्यादित नसून, स्थानिक स्वराज्य संस्था, गोकुळ दूध संघ निवडणूक आणि कोल्हापूरच्या व्यापक राजकारणात भीमगर्जना निर्माण करणारा ठरल्याचं बोललं जातं. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की, “अरुण डोंगळे यांच्या आगमनाने पक्षाला शंभर हत्तींचं बळ मिळालं आहे. आगामी महापालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.”
डोंगळेंच्या संघटन कौशल्याचा लाभ
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी अरुण डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करताना “त्यांच्या अनुभवामुळे सहकार आणि शेतकरी क्षेत्रातील विविध योजना प्रभावी रितीने राबवता येतील. कोल्हापुरातील संघटन मजबूत होऊन राष्ट्रवादी नेतृत्वाला भक्कम आधार मिळेल,” असं मत व्यक्त केलं. अनेक पदाधिकाऱ्यांनीही डोंगळेंच्या प्रवेशामुळे पक्षांतर्गत नवचैतन्य आल्याच्या भावना व्यक्त केल्या.
Surendra Pathare : फडणवीसांचा पवारांना दे धक्का, बड्या नेत्याचा मुलगा भाजपात प्रवेश करण्याची चर्चा, पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलात बैठक
बदलणार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे
अरुण डोंगळे पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “राष्ट्रवादीच्या संघटनासाठी मी पडेल ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना संघटन घट्ट करण्याचा मी निर्धार केला आहे.”
सरकारचा एकही कार्यक्रम यशस्वी होणार नाही; धनगर समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
मागील काही काळात डोंगळे हे शिवसेनेच्या संपर्कात असूनही अखेर राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याने, कोल्हापूरच्या ग्रामीण ते सहकारी क्षेत्रातील राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. त्यांच्या अग्रेसर नेतृत्वामुळे पक्षातील गटबाजी कमी होऊन राष्ट्रवादीच्या मतपेढीला थेट फायदा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Aba Bagul : राजीव गांधींचे विश्वासू, सहा वेळा पुण्यातून लोकप्रतिनिधी, हयात काँग्रेसमध्ये घालवलेला तगडा नेता भाजपच्या वाटेवर
दरम्यान गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील वर्चस्वासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्या जोमाने सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या विरोधी गटांपुढे आव्हान उभं राहण्याची शक्यता सशक्त झाली आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात बदलाची नांदी ठरण्याची चिन्हं स्पष्ट दिसून येतात.

