• Fri. Mar 13th, 2026

    नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची चाके थांबलेलीच! महारेल अन् मध्य रेल्वे प्रकल्पाबाबत अनुत्सुक

    नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची चाके थांबलेलीच! महारेल अन् मध्य रेल्वे प्रकल्पाबाबत अनुत्सुक

    Nashik-Pune Semi High Speed Railway: सुमारे २३२ किमीचा हा मार्ग केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून साकारण्यात येणार आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली.

    high speed train(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नाशिक: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याच्या प्रस्ताव अद्याप अंमलबजावणीच्या स्तरावर येऊ शकलेला नाही. महारेल आणि मध्य रेल्वे या प्रस्तावाबाबत फारसे उत्सुक नसल्याचे चित्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुढे आले आहे. त्यामुळे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे यार्डातून बाहेर पडणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    सुवर्ण त्रिकोणात समाविष्ट पुणे-मुंबई ही दोन महानगरे अनेक वर्षांपूर्वी रेल्वेमार्गाने जोडली गेली आहेत. याशिवाय नाशिक-मुंबईही रेल्वेमार्गाने जोडली आहेत. परंतु पुणे-नाशिक रेल्वेमार्ग दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांसाठी दिवास्वप्न ठरले आहे. वर्षानुवर्ष केवळ या रेल्वे प्रकल्पाच्या चर्चाच सुरू असून, तो कधी अस्तित्वात येणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
    Maharashtra TimesManmad News: निर्दयी जग, कोवळा जीव अन् हतबल माता…; वासराच्या मृत्यूनंतर मनमाडमध्ये गोमातेचा अघोषित रास्ता रोको
    राज्य सरकारच्या महाराष्ट्र रेल्वे कॉपोर्रेशनच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी साधारण १६ हजार ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पाकरिता ४५ हेक्टर भूसंपादनही झाले आहे. महारेलने प्रस्तावित केलेला रेल्वेमार्ग व्यवहार्य होत नसल्याने महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत वेगवेगळ्या पर्याय चाचपडण्यात येत आहेत.
    Maharashtra TimesNashik Onion: चाळीतच सडला उन्हाळ कांदा; कोंब फुटले, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
    महसूल विभागाने जमिनीच्या मूल्यांकनासह भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू केली. परंतु निधीच्या चणचणीचे कारण देत महारेलने जिल्हाधिकारी कार्यालयास भूसंपादनाचे कामकाज थांबविण्यास सांगितले. तेव्हापासून हे काम थांबलेच आहे. या प्रकल्पाला बूस्ट देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्स बोलावली होती. परंतु, त्यामध्ये रेल्वे प्रशासन व महारेलने या प्रकल्पाबाबत फारसे स्वारस्य दाखविले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
    Maharashtra Timesकर्मचाऱ्यांशी गैरवर्तन पडलं महागात; नाशिकचे Grade PSI निलंबित, पोलिस उपायुक्तांची मोठी कारवाई
    खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप केंद्राजवळून हा रेल्वे मार्ग नेणे सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असल्याने तो शिर्डीमार्गे वळविण्याचे विचाराधीन आहे. यामुळे हे अंतर ८० किलोमीटरने वाढून ३१५ किलोमीटर होत आहे. याउलट हा मार्ग संगमनेर मार्गेच न्यावा, अशी मागणीही जोर धरते आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा