Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय.
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील लहान पांढरकवडा येथे 13 सप्टेंबरला ही घटना घडली. गावातील कौशल्याबाई महादेव कोंडेकर (वय 55) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांनी जवळच्या नाल्याच्या काठावर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. गावकरी नाल्याच्या काठावर अंत्यविधीसाठी एकत्र आले.
Raigad Crime : नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला, आठ दिवसांपासून होते बेपत्ता; पोलिसांना वेगळाच संशय
अंत्यसंस्कार सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने कोंडेकर कुटुंबीय आणि गावकरी घरी परत गेले. मात्र या पावसाने नाल्याला क्षणात पूर आला. काठावरील अर्धवट जळालेला मृतदेह देखील वाहून गेला. पाऊस थांबल्यावर अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय परतले. नाल्याच्या काठावर मृतदेह दिसून आला नाही. त्यांनी गावात येऊन माहिती दिली. गावकऱ्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही मृतदेह सापडत नसल्याने गावकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन मदतीसाठी विनवणी केली. पण, पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध शोध शासकीय यंत्रणा घेत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोमवारीही गावकरी दिवसभर मृतदेहाचा शोध घेत होते.
गावाला स्मशानभूमी नाही
गावाजवळून वाहणारा नाला जंगलात जात असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत आहे. मुळात अनेक वर्षांपासून गावाजवळ स्मशानभूमी असावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीने स्मशानभूमीसाठी जागा दिली होती. त्यात काही अडचण निर्माण झाल्याने प्रश्न कायम राहिला.
Chhatrapati Sambhajinagar Rain : संभाजीनगरात पावसाचा कहर! अनेक गावांना पुराचा तडाखा, शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र
शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ६ तास वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदस्य पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. यात केळगाव, आधारवाडी, तांडा, कोहळा या गावांना याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह माती वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

