• Mon. Mar 16th, 2026
    Yavatmal News : अंत्यसंस्कारादरम्यान पूर, मृतदेह गेला वाहून! नातेवाईकांकडून शोध सुरू, अधिकारी म्हणतात, ‘आम्ही फक्त…’

    Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय.

    अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    आरती गंधे, यवतमाळ : अंत्यसंस्कार सुरू असताना नाल्याला आलेल्या पुरात अर्धवट जळालेला मृतदेह (Deadbody) वाहून गेला. दोन दिवसांपासून शोध घेत असतानाही मृतदेह सापडत नसल्याने नातेवाइकांनी शासकीय अधिकाऱ्यांना (Yavatmal) मदत मागितली. पण, ‘जिवंत माणूस वाहून गेल्यास आम्ही त्याचा शोध घेतो. मृतदेहाचा शोध घेणे नियमात बसत नाही,’ असे अधिकाऱ्यांनी ठणकावले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या मोबाइलसाठी 22 तास शोध मोहीम राबविण्यात आली होती.

    यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील लहान पांढरकवडा येथे 13 सप्टेंबरला ही घटना घडली. गावातील कौशल्याबाई महादेव कोंडेकर (वय 55) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांनी जवळच्या नाल्याच्या काठावर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. गावकरी नाल्याच्या काठावर अंत्यविधीसाठी एकत्र आले.

    Maharashtra TimesRaigad Crime : नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला, आठ दिवसांपासून होते बेपत्ता; पोलिसांना वेगळाच संशय

    अंत्यसंस्कार सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने कोंडेकर कुटुंबीय आणि गावकरी घरी परत गेले. मात्र या पावसाने नाल्याला क्षणात पूर आला. काठावरील अर्धवट जळालेला मृतदेह देखील वाहून गेला. पाऊस थांबल्यावर अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय परतले. नाल्याच्या काठावर मृतदेह दिसून आला नाही. त्यांनी गावात येऊन माहिती दिली. गावकऱ्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही मृतदेह सापडत नसल्याने गावकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन मदतीसाठी विनवणी केली. पण, पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध शोध शासकीय यंत्रणा घेत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोमवारीही गावकरी दिवसभर मृतदेहाचा शोध घेत होते.

    गावाला स्मशानभूमी नाही

    गावाजवळून वाहणारा नाला जंगलात जात असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत आहे. मुळात अनेक वर्षांपासून गावाजवळ स्मशानभूमी असावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीने स्मशानभूमीसाठी जागा दिली होती. त्यात काही अडचण निर्माण झाल्याने प्रश्न कायम राहिला.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Rain : संभाजीनगरात पावसाचा कहर! अनेक गावांना पुराचा तडाखा, शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र

    शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ६ तास वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदस्य पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. यात केळगाव, आधारवाडी, तांडा, कोहळा या गावांना याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह माती वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा