Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यामध्ये हत्या, खून, जीवघेणा हल्ला याचा समावेश आहे, या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री पवार यांनी मोठे विधान केले आहे.
हडपसर येथे पवार यांचा जनसंवादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शहरातील नाना पेठ भागात झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाबाबत विचारले असता, पवार यांनी बालगुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. ‘मी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी; तसेच केंद्र सरकारच्या मान्यवरांशी चर्चा केली आहे. मुले लहान वयातच खुनासारखे गंभीर गुन्हे करीत आहेत. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करूनही, वय कमी असतानाही त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे काहीतरी करणे भाग पडेल,’ असे अजित पवार म्हणाले.
Pune Crime : दिवसाढवळ्या घरात दरोडा, चोर ऊसात लपले, पोलिसांनी ड्रोन अन् तरुणांना कामाला लावलं अन्…; पुण्यात सिनेस्टाईल घटना
पवार म्हणाले, ‘आयुष कोमकर प्रकरणात पोलिस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून अनेक आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. पोलिसांनी जी काळजी घ्यायला हवी, ती काळजी घेण्याच्या सूचना आम्ही पोलिस विभागाला दिल्या आहेत. कोणताही राजकीय दबाव न घेता पारदर्शक तपास व्हावा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.’
Pune Crime: पुण्यात IT कंपनीसमोर तरुणावर कोयत्याने हल्ला; सत्य समोर आल्यावर पोलीसही चक्रावले, CCTV मध्ये काय दिसलं?
‘राष्ट्रवादी काँग्रेस’मधील आंदेकर गटाबाबत विचारले असता, पवार म्हणाले, ‘याआधी आंदेकर यांचा काँग्रेसमध्ये समावेश होता. कोणत्याही पक्षात कार्यकर्ते, नगरसेवक सामील होतात, तेव्हा ते असे गुन्हे करतील असे कोणालाच वाटत नाही. पण, काही लोकांनी गैरप्रकार केले, गुन्ह्यात अडकले, ही एक विकृती आहे.’
Pune News: पुण्यातील मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयारासारखी रचना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ, 200 पोलीस तैनात
‘तिघांचे काम समन्वयानेच’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याची चर्चा असून, तशा बातम्याही आल्या आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. यावर दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी असल्याच्या चर्चा अजित पवार यांनी फेटाळून लावल्या. ‘आम्ही तिघेही समन्वयाने काम करीत आहोत. राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे पवार यांनी सांगितले.
‘अन्याय होऊ देणार नाही’
सातारा गॅझेट प्रकरणात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल,’ असेही पवार यांनी सांगितले. महिला आयपीएस प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे प्रतिक्रिया दिली असल्याचेही ते म्हणाले. लोकसंख्या वाढली तसे प्रभाग रचना बदल झाले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे २०२९ मध्ये खासदारांची संख्या वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

