मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मात्र या आंदोलनात नियमांची पायमल्ली होत असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टाने आंदोलकांनी व्यापलेले दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असं म्हणत मराठा भगिनींनी देखील सरकारला इशारा दिला.
भगवं वादळ तुमच्या अंगावर यायला कमी करणार नाही; मराठा रणरागिणींचा फडणवीस सरकारला इशारा
