Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली होती. पण आता त्यांनी सरकारला नवा पर्याय सूचवला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी आता नवा पर्याय सूचवला आहे. “उपसमितीची आज दोन वेळेस बैठक झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सरसकटला प्रोब्लेम आहे. पण असण्याचं कारण नाही. पण त्याला दुसराही पर्याय आहे. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या 58 लाख नोंदींच्या आधारे जीआर काढा. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण द्या. सरसकट शब्द वापरु नका. त्या 58 लाख नोंदींच्या आधारावर अध्यादेश काढा की, कुणबी ही उपजात आहे. 2012 च्या कायद्याने ओबीसी आरक्षण मजबुत केलं. तु्म्ही त्या कायद्यानुसार या आरक्षणासाठी पात्र ठरत आहात. मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांची कुणबी ही उपजात घ्या. ज्यांना कुणबी घ्यायचं आहे तो घेईल, ज्यांना नाही घ्यायचं तो घेणार नाही. सरसकट म्हणायची गरज नाही”, असा नवा पर्याय मनोज जरांगे यांनी सुचवला.
“आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार, अभ्यासकांसोबत फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट्स सरकारला देणार नाहीयत. त्याचं कारण असं, सरकारने 13 महिन्यांपूर्वी डॉक्युमेंट घेतले होते. आता देऊन उपयोग नाही. सरकारने 13 महिन्यांपूर्वी हैदराबात संस्थानकडून डॉक्यूमेंट्स घेतले. आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव आणि आपल्या राज्याचे मुख्य सचिव यांनी हैदराबाद संस्थानच्या डॉक्युमेंट्सची टेस्टिंग केली. त्या उचलून आणल्या असत्या, इथल्या मागासवर्ग आयोगाला, केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या कॅबिनेटला आणि इथल्या समितीला आणि 2012 च्या कायद्याला म्हणजे हे पंचसूत्री आहे, ह्याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथल्या मुख्य सचिवांनी तिकडच्या मुख्य सचिवांकडून अॅडजेस्टेड करुन आणायचं होतं ते आणलं नाही. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली की, काय केलं पाहिजे? सातार आणि हैदराबादच्या गॅझेटियरसाठी मी एक मिनिटही वेळ द्यायला तयार नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
“सातारा संस्थानचं गॅझेटियर असेल तर एकदम सोपा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुरा बसतो. हैदराबादचं गॅझेटियर सांगतं की, मराठवाड्याचा मराठा हा कुणबी आहे. म्हणून त्यांना द्यायची काही गरज नाहीय. त्यांनी शिंदे समितीने सरकारला अहवाल देणं गरजेचं आहे. सरकारने राज्य मागास आयोगाकडून तो अहवाल जाणं गरजेचं आहे. त्यानंतर ते आरक्षण द्या. ते टिकवायचं आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आहेत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा