• Sat. Mar 14th, 2026
    विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, भागीदार दळवी कुटुंब गोत्यात, मुली-जावयांना अटक

    Virar News : ​​ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न देता अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने पालिकेच्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी तात्काळ विकासकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती

    विरार दुर्घटनेतील मयत कुटुंब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा : विरार येथील इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास आता विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्षा ३ कडे सोपविण्यात आला आहे. विरार पोलिसांनी बुधवारी इमारत विकासाला अटक केल्यानंतर शुक्रवारी भागीदार असलेल्या आणि जमीन मालक असलेल्या इतर चार जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकारांत आत्तापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

    विरारच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळून मंगळवारी मध्यरात्री दुर्घटना घडली होती. यामध्ये १७ जणांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी झाले होते. पहिला वाढदिवस साजरा करणाऱ्या चिमुकलीसह तिच्या आई वडिलांनाही यात प्राण गमवावे लागले होते.
    Maharashtra TimesCardiac Arrest : कार्डिअ‍ॅक सर्जनलाच हृदयविकाराने गाठलं, रुग्णसेवा करतानाच डॉक्टर कोसळले, अवघ्या 39 व्या वर्षी जगाचा निरोप
    ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न देता अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने या प्रकरणी पालिकेने तक्रार दिल्यानंतर विरार पोलिसांनी तात्काळ विकासकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखा कक्षा ३ कडे सोपविण्यात आला. नितल साने असे अटक केलेल्या विकासकाचे नाव असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. या तपासादरम्यान पोलिसांना या इमारतीमध्ये दळवी कुटुंब भागीदार असल्याचे समोर आले.
    Maharashtra TimesNashik Crime : कुटुंबासाठी काही करु शकलो नाही; शेवटच्या चिठ्ठीत भावनिक शब्द, 25 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअरने आयुष्य संपवलं
    दळवी कुटुंबातील मूळ मालक याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर ती जमीन आता त्याच्या दोन मुली आणि जावई यांच्या नावावर आहे. त्यामुळे भागीदारी करत रमाबाई अपार्टमेंट मधील ५४ फ्लॅट्स आणि ६ दुकानांपैकी ३२ फ्लॅट आणि ३ दुकाने ही साने याच्या मालकीची होती आणि २२ फ्लॅट, ३ दुकाने ही दळवी कुटुंबातील दोन मुलींच्या नावे. त्यातील ११ सदनिका या अजूनही दळवी यांच्या दोन मुली यांच्या नावावर आहेत. सर्व फ्लॅट्स साने किंवा दळवी यांनी नोटरी पद्धतीने रहिवाशांना विकल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखा कक्ष ३ यांनी या प्रकरणी दळवी कुटुंबातील २ मुली आणि या कुटुंबाचे २ जावई यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा