• Sat. Mar 14th, 2026
    Devendra Fadnavis: राजकीय पोळी भाजू नका; मराठा आंदोलनवरुन CM फडणवीसांचा विरोधकांना इशारा

    Devendra Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू करताना काही आंदोलकांनी मंत्रालय परिसरात जमून घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

    devendra fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मराठा समाजाच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक आहे. या मागण्यांबाबत सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. परंतु, काही लोकांकडून मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. यातून तुमचे तोंड भाजेल,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांना दिला. त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागणीवर कायदेशीर भूमिका घेण्याचे आवाहन विरोधी पक्षाला केले.

    मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज मुंबईत एकवटला आहे.
    Maharashtra Timesआरक्षण मिळेपर्यंत मुंबईतच! मनोज जरांगेंचा निर्धार, आंदोलनास पोलिसांकडून आणखी एक दिवसासाठी परवानगी
    ‘एखाद्या निर्णयाचा परिणाम दीर्घ काळ असतो. त्यामुळे असे निर्णय सर्वसमावेशक आणि चर्चेतून घ्यायचे असतात. लोकांना एकमेकांसमोर झुंजवणे आणि प्यादे लढवणे हे या सरकारचे धोरण नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesAjit Pawar : ‘मी त्यांच्या आरोपांना किंमत देत नाही, विनाशकाली विपरीत बुद्धी…’, अजित पवार कुणाबाबत बोलले?
    ‘सध्या वेगवेगळे पक्ष सोयीची भूमिका घेत आहेत. त्यांना आवाहन आहे, की भूमिका घ्यायची असेल तर ठाम भूमिका घ्या. मात्र, हे पक्ष ठाम भूमिका घेताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष आरक्षणावर कायदेशीर भूमिका सांगणार नाहीत. कारण त्यांना समाजा-समाजात भांडण होताना राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.

    ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मागच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या घेतल्या आहेत. त्यांची भूमिका त्या पत्रातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता सोयीची भूमिका घेणे आणि लोकांची दिशाभूल करणे थांबवले पाहिजे. महाराष्ट्राची सामाजिक वीण कशी नीट ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
    Maharashtra TimesGaneshotsav Special Train : रेल्वे प्रवाशांसमोर विलंबाचे विघ्न, ढिसाळ नियोजनाचा कोकणवासियांना फटकामुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
    मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर आम्ही मार्ग काढू.
    राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे काही मागण्या पाठवल्या आहेत. यावर समिती विचार करत आहे.
    मराठा समाजाला कायदेशीर आणि संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. यासाठी आमचा प्रयत्न आहे.
    कोणत्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांच्या समोर उभे राहू नयेत.
    सरकारला ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल.
    गेल्या १० वर्षांत मराठा समाजाला आमच्याच काळात न्याय मिळाला आहे.
    मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्ही केले.
    मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगाराच्या योजना आमच्या सरकारने सुरू केल्या.
    लोकशाही पद्धतीने एखादे आंदोलन चालणार असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.
    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलनाला सहकार्य केले जात आहे; आंदोलकांनी आडमुठेपणाने वागू नये.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा