मात्र त्यानुसार दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यास प्रामुख्याने भाईंदरच्या राई ग्रामस्थांकडून गुरुवारी नकार देण्यात आला. गावातील नैसर्गिक तलावाजवळ गुरुवारी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी येत, त्यांच्याकडून तेथे गणपतीच्या विसर्जनाची मागणी करण्यात आली. मात्र त्यास प्रशासनाकडून होकार दर्शवला जात नसल्याने त्यांनी गणपतीचे विसर्जन न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भर पावसात अनेक भाविक गणपती घेऊन थांबलं असू मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे. मागील अनेक पिढ्यांपासून गणरायाचे नैसर्गिक तलावात विसर्जन होत आहे. त्यामुळे यंदा देखील नैसर्गिक तलावातच गणरायाचं विसर्जन व्हायला हवे, अशी भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आली आहे. त्यास परवानगी न दिल्यास गणेश विसर्जन करणार नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.
लालबागचा राजाची पहिली दानपेटी उघडली
गणेशोत्सवाची धूम संपूर्ण देशात सुरु आहे. पण, महाराष्ट्रात या उत्सवाची भव्यता पाहण्यासारखी असते. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व भागात गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि लाडका गणपती म्हणजेच “लालबागचा राजा” यावेळीही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी येथे दर्शन घेतलं.
मंडळाने लालबागचा राजाची पहिली दानपेटी उघडली तेव्हा सारेच चकित झाले. देणग्यांमध्ये अमेरिकन डॉलर्सचा हार, कोट्यवधी रुपयांचा हार, इथकंच नाही तर क्रिकेट बॅटचाही समावेश होता. हे श्रद्धेचं एक अनोखं उदाहरण आहे. “गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया”च्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झालं आहे.
