• Thu. Jun 18th, 2026

    दीड दिवसांच्या गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जनास नकार, ग्रामस्थ मूर्ती घेऊन तलावाजवळ बसले

    दीड दिवसांच्या गणपतीचं कृत्रिम तलावात विसर्जनास नकार, ग्रामस्थ मूर्ती घेऊन तलावाजवळ बसले
     ठाणे
     मिरा-भाईंदरमध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. येथे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यास नकार दर्शवत नैसर्गिक तलावात विसर्जन करण्याची भूमिका भाईंदरच्या राई ग्रामस्थांकडून गुरुवारी घेण्यात आली आहे. त्याकरता गणरायाचे विसर्जन त्यांच्याकडून रोखून ठेवण्यात आले आहे.वाढत्या पाणी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीच्या सहा फूट हून अधिक उंचीच्या गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मिरा-भाईंदरच्या विविध भागात पालिकेकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच नैसर्गिक ठिकाणी म्हणजेच तलाव व खाडीत विसर्जनास मनाई केली जात आहे.

    मात्र त्यानुसार दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यास प्रामुख्याने भाईंदरच्या राई ग्रामस्थांकडून गुरुवारी नकार देण्यात आला. गावातील नैसर्गिक तलावाजवळ गुरुवारी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी येत, त्यांच्याकडून तेथे गणपतीच्या विसर्जनाची मागणी करण्यात आली. मात्र त्यास प्रशासनाकडून होकार दर्शवला जात नसल्याने त्यांनी गणपतीचे विसर्जन न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भर पावसात अनेक भाविक गणपती घेऊन थांबलं असू मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे. मागील अनेक पिढ्यांपासून गणरायाचे नैसर्गिक तलावात विसर्जन होत आहे. त्यामुळे यंदा देखील नैसर्गिक तलावातच गणरायाचं विसर्जन व्हायला हवे, अशी भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आली आहे. त्यास परवानगी न दिल्यास गणेश विसर्जन करणार नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.

    लालबागचा राजाची पहिली दानपेटी उघडली

    गणेशोत्सवाची धूम संपूर्ण देशात सुरु आहे. पण, महाराष्ट्रात या उत्सवाची भव्यता पाहण्यासारखी असते. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व भागात गणेशभक्तांनी ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि लाडका गणपती म्हणजेच “लालबागचा राजा” यावेळीही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी येथे दर्शन घेतलं.

    मंडळाने लालबागचा राजाची पहिली दानपेटी उघडली तेव्हा सारेच चकित झाले. देणग्यांमध्ये अमेरिकन डॉलर्सचा हार, कोट्यवधी रुपयांचा हार, इथकंच नाही तर क्रिकेट बॅटचाही समावेश होता. हे श्रद्धेचं एक अनोखं उदाहरण आहे. “गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया”च्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झालं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed