• Tue. Jun 16th, 2026
    जरांगेंवर वारंवार उपोषणाची वेळ आणली जात आहे, इतकं लिहून तरुणाने विष घेतलं अन्… लातूर हादरलं

    Maratha Reservation Youth Try To Kill Himself: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच लातुरात मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर: मराठा आरक्षण ाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बुधवारी (29 ऑगस्ट) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी हजारो मराठा हे मुंबईत धडकणार आहेत. बुधवारी सकाळी आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येला लातूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    विष प्राशन करत जीव देण्याचा प्रयत्न

    अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावातील बळीराम मुळे या 35 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे.
    Maharashtra TimesManoj Jarange: मनोज जरांगे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट, समर्थकांनी युट्यूबरचे कपडे फाडले, तोंडाला काळं फासलं, छ. संभाजीनगरात तणाव

    सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याची टीका

    सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार वेळकाढूपणा करत आहे, मनोज जरांगे यांच्यावर वारंवार उपोषणाची वेळ आणली जात आहे, अशा आशयाची चिठ्ठी खिशात ठेवून या व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.सध्या या व्यक्तीवर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले असतानाच या घटनेमुळे समाजात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
    Maharashtra TimesMaratha Reservation: जरांगे पाटील मुंबईकडे निघण्याआधीच सरकारकडून पहिली मागणी मान्य; आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची मोठी घोषणा

    चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लिहून विष प्राशन

    अहमदपूर तालुक्यातील बळीराम मुळे या युवकाने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असक्षम असल्याच्या कारणावरून विष प्राशन करत असल्याचे आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. सरकारने आतापर्यंत आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा होता. मात्र अद्याप आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवल्यामुळे हा पर्याय निवडत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यात अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपले बलिदान दिले आहेत. त्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा