Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली. अनेक गावांचा संपर्क तुटला गेला, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यादरम्यान राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्याचा संपर्क तुटला, कोणता जाणून घ्या.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पावसाने थैमान घातला आहे. याचा परिणाम छत्रपती संभाजी नगर मुंबई कनेक्टिव्हिटी वर पडला आहे. मुंबईहून ३६४ प्रवाशांना घेऊन येणार इंडिगो विमान मंगळवारी सायंकाळी रद्द करण्यात आलं. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर मधून जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत, बल्लारशाह या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, जनशताब्दी यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरुन जाताना जोरदार धडक, लांबवर फेकले गेले अन् दोन मित्रांचा एकत्र अंत, कुंटुंबाचा आक्रोश पाहवेना
राज्यात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसाची परिस्थिती बघून प्रवासी मुंबईला जाणे टाळत आहे. ट्रॅव्हल्स सह इतर वाहनांच्या प्रवासी संख्येत 50 ते 60 टक्क्यांची घट झाली आहे. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेच्या अर्थकारणावर पडला आहे.
Crime News : गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट, CA च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला
एसटी महामंडळावर देखील परिणाम…
एसटी महामंडळाचे विभाग वाहतूक नियंत्रण संतोष घाणे म्हणाले की, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी 550 बसच्या माध्यमातून एक लाख 98 हजार प्रवासी प्रवास करतात. तर छत्रपती संभाजी नगर वरून मुंबईला नियमित दोन बस धावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये वीस हजार प्रवासी कमी झाले आहे, असं घाणे म्हणाले.

