• Sun. Mar 8th, 2026
    महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्याच्या मुंबईशी संपर्क तुटला; ट्रेन विमान सर्वच सेवा बंद, कोणता आणि काय कारण?

    Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली. अनेक गावांचा संपर्क तुटला गेला, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यादरम्यान राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्याचा संपर्क तुटला, कोणता जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम छत्रपती संभाजीनगर मुंबई कनेक्टिव्हिटीवर पडला आहे. मंगळवारी मुंबईहून येणारे इंडिगो विमान रद्द करण्यात आले, बुधवारी शहरातून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी त्याचबरोबर बल्लारशहा एक्सप्रेस रद्द करण्यात आली. याचा परिणाम दहा हजार प्रवाशांना सहन करावा लागला आहे. दोन दिवसांपासून मुंबई संभाजीनगरचा संपर्क तुटला आहे. पावसाची परिस्थिती पाहता मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये देखील ५० टक्क्यांची घट झाली आहे.

    गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पावसाने थैमान घातला आहे. याचा परिणाम छत्रपती संभाजी नगर मुंबई कनेक्टिव्हिटी वर पडला आहे. मुंबईहून ३६४ प्रवाशांना घेऊन येणार इंडिगो विमान मंगळवारी सायंकाळी रद्द करण्यात आलं. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर मधून जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत, बल्लारशाह या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबईवरून छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वंदे भारत एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, जनशताब्दी यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: दुचाकीवरुन जाताना जोरदार धडक, लांबवर फेकले गेले अन् दोन मित्रांचा एकत्र अंत, कुंटुंबाचा आक्रोश पाहवेना
    राज्यात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पावसाची परिस्थिती बघून प्रवासी मुंबईला जाणे टाळत आहे. ट्रॅव्हल्स सह इतर वाहनांच्या प्रवासी संख्येत 50 ते 60 टक्क्यांची घट झाली आहे. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेच्या अर्थकारणावर पडला आहे.
    Maharashtra TimesCrime News : गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट, CA च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला

    एसटी महामंडळावर देखील परिणाम…

    एसटी महामंडळाचे विभाग वाहतूक नियंत्रण संतोष घाणे म्हणाले की, वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी 550 बसच्या माध्यमातून एक लाख 98 हजार प्रवासी प्रवास करतात. तर छत्रपती संभाजी नगर वरून मुंबईला नियमित दोन बस धावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवर झाले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये वीस हजार प्रवासी कमी झाले आहे, असं घाणे म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा