• Tue. Mar 10th, 2026

    Wardha Accident : भरधाव कारचा टायर फुटला, वडिलांचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात आई, मुलगा अन् मुलीचा जागीच अंत, महाराष्ट्र हळहळला

    Wardha Accident : भरधाव कारचा टायर फुटला, वडिलांचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात आई, मुलगा अन् मुलीचा जागीच अंत, महाराष्ट्र हळहळला

    Wardha Car Accident Three People Dead : वर्ध्याहून नागपूरला जाताना एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघाता कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई, मुलगा आणि मुलीचा समावेश आहे.

    वर्धा कार अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    एकनाथ चौधरी, वर्धा : वर्ध्याहून नागपूरला जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील तथा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झालं आहे. ही घटना तुळजापूर नागपूर मार्गावर खडकी नजीक सामाजिक वनिकारणच्या नर्सरीजवळ सायंकाळी आज साडेपाच वाजता घडली आहे. वर्ध्याच्या जुनघरे परिवारातील सदस्य हे नागपूर येथे कारने जात असताना हा भीषण अपघात घडला आहे.

    अपघात कसा झाला?

    नागपूर महामार्गावरील खडकीजवळ आज बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा भीषण अपघात घडला. पत्नी वैशाली जयंत जुनघरे (वय ५०), मुलगी आस्था जयंत जुनघरे (वय २२) आणि मुलगा सोनू जयंत जुनघरे (वय २५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर स्वत: पती तथा वडील जयंत जुनघरे (वय ५५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली, आस्था आणि सोनू या मायलेकांचा मृत्यू झाला होता. जयंत हे गंभीर जखमी असल्याने त्यांना सेवाग्रामच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सिंदी पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
    Maharashtra TimesThane Rain Update : ठाण्यात धुवाधार! गणेशोत्सवाच्या तोंडावर कारखान्यांत पाणीच पाणी, मूर्तींचे प्रचंड नुकसान

    भरधाव कारचा टायर अचानक फुटला. अशातच चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. वाहन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या बाजूला गेलं. अचानक आलेल्या ट्रकची धडक कारला लागली. यात कारमधील आई, मुलगा आणि मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. वर्धा-नागपूर मार्गावरील आमगाव फाटा परिसरात अपघात पाहून अनेकजण धावून आले. एम. एच. 43 बी. एन. 1986 क्रमांकाच्या कारने चौघेजण वर्धेकडून नागपूरच्या दिशेने जात होते. कार खडकी-आमगाव फाटा दरम्यान आली असता भरधाव कारचा टायर अचानक फुटला. वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना कार दुभाजकावर आदळली.

    Maharashtra TimesJalgaon News : विजेच्या धक्क्याने लेकरा-बाळांसह पाच जणांचा अंत, मृतदेह नेताना रुग्णवाहिका बंद, दोर बांधून रुग्णालयापर्यंत

    अशातच रस्त्याने येणाऱ्या ट्रकने कारला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार रस्ता दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात शिरली. अपघात झाल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय जखमीला सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केलं. या अपघातात कारमधील तिघे दगावल्याचं तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताची नोंद सिंदी पोलिसांनी घेतली आहे.

    Maharashtra Times50 खोके म्हणताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्या अन्.., विरोधकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध

    भीषण अपघातात एकाचा मृत्यू

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव-पारोळा रस्त्यावर एसटी बस आणि एका खासगी वाहनाचा अपघात झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भीषण अपघातात एक जण ठार झाला अजून अनेक जण जखमी झाले आहेत. आज बुधवार २० ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा