• Fri. Mar 13th, 2026

    राज्यात २० लाख १२ हजार हेक्टर शेती पिकाचं नुकसान, कृषीमंत्र्यांकडून नांदेडमध्ये पाहणी, काय म्हणाले?

    राज्यात २० लाख १२ हजार हेक्टर शेती पिकाचं नुकसान, कृषीमंत्र्यांकडून नांदेडमध्ये पाहणी, काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्यात मागील चार ते पाच दिवसात पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास २० लाख १२ हजार हेक्टर अंदाजे नुकसान…झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज हदगाव तालुक्यातील नुकसानग्रस्थ भागाची पाहणी केली. नांदेड जिल्हयात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले.एकट्या नांदेड जिल्ह्यात ७ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालंय.तर वाशिम जिल्ह्यात ४ लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे सुरु केले असून येत्या आठ दिवसात अहवाल शासनाला प्राप्त होईल. नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed