Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
बदनापूर तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक 271 मध्ये भाऊसाहेब गणपत हिरे ह जनावरांना पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. ज्यामध्ये त्यांच्या बचावाची संधीच मिळाली नाही, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Buldhana News : शेतकऱ्याने पूर्णा नदीत घेतली जलसमाधी, प्रकल्पबाधिताने स्वातंत्र्यदिनी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ
मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु होता. त्यातच हिरे आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी ते मोटार चालू करण्यासाठी विद्युत पंपाकडे गेले. मात्र पावसामुळे तिथे असलेल्या स्टार्टरला करंट आला होता, त्यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या त्यांच्या पाश्चात एक पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीसोबत मोलमजुरीही ते करत होते. मुलांचे शिक्षणासाठी ते बांधकाम मिस्तरी हे काम सध्या करत होते. मात्र त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना पाच भाऊ दोन बहीण असून सर्व कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मात्र घरातील एकमेव करता पुरुष गेल्याने त्यांची पत्नी न शारदाबाई भाऊसाहेब हिरे यांच्या वरती कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली आहे कारण एका मुलीचं लग्न झालं असून दुसऱ्या मुलाचे शिक्षण हे छत्रपती संभाजी नगर याठिकाणी सुरू आहे. तरी शेती करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच मुलाचं शिक्षण हे करण्याची जबाबदारी मात्र त्यांच्या पत्नीवरती येऊन ठेपली आहे. प्रशासनांना या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत कराव अशी आर्त हाक या कुटुंबांने दिली आहे.

