• Wed. Jun 10th, 2026
    जनावरांच्या पाण्यासाठी मोटर चालू करायला गेले अन् आक्रीत घडलं, शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत

    Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    संजय आहेर, जालना : जालन्यातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बदनापूर तालुक्यातील चिखली या ठिकाणी 13 ऑगस्टला ही घटना घडली आहे.

    बदनापूर तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक 271 मध्ये भाऊसाहेब गणपत हिरे ह जनावरांना पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. ज्यामध्ये त्यांच्या बचावाची संधीच मिळाली नाही, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesBuldhana News : शेतकऱ्याने पूर्णा नदीत घेतली जलसमाधी, प्रकल्पबाधिताने स्वातंत्र्यदिनी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ
    मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु होता. त्यातच हिरे आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी ते मोटार चालू करण्यासाठी विद्युत पंपाकडे गेले. मात्र पावसामुळे तिथे असलेल्या स्टार्टरला करंट आला होता, त्यांचा हात लागल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या त्यांच्या पाश्चात एक पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीसोबत मोलमजुरीही ते करत होते. मुलांचे शिक्षणासाठी ते बांधकाम मिस्तरी हे काम सध्या करत होते. मात्र त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना पाच भाऊ दोन बहीण असून सर्व कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

    मात्र घरातील एकमेव करता पुरुष गेल्याने त्यांची पत्नी न शारदाबाई भाऊसाहेब हिरे यांच्या वरती कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली आहे कारण एका मुलीचं लग्न झालं असून दुसऱ्या मुलाचे शिक्षण हे छत्रपती संभाजी नगर याठिकाणी सुरू आहे. तरी शेती करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच मुलाचं शिक्षण हे करण्याची जबाबदारी मात्र त्यांच्या पत्नीवरती येऊन ठेपली आहे. प्रशासनांना या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत कराव अशी आर्त हाक या कुटुंबांने दिली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा