• Fri. Jun 19th, 2026

    भाजप आमदार किसन कथोरे यांचा आरोपांचा बॉम्ब, बदलापूरमध्ये प्रभाग रचनेत मोठी फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक दावा

    भाजप आमदार किसन कथोरे यांचा आरोपांचा बॉम्ब, बदलापूरमध्ये प्रभाग रचनेत मोठी फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक दावा

    बदलापूर येथून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर पालिकेच्या प्रशासकांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती किसन कथोरे यांनी दिली आहे. तसेच येत्या तीन दिवसांत आपण पुरावादेखील सादर करणार असल्याचा दावा कथोरे यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : बदलापूर पालिकेच्या प्रभाग रचनेत मोठी फिक्सिंग झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे फिक्सिंग करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा देखील मोठा आरोप किसन कथोरे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण प्रशासकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती किसन कथोरे यांनी दिली आहे. याबाबत येत्या 18 ऑगस्टला पुरावे समोर येणार असल्याचा मोठा दावा किसन कथोरे यांनी केला आहे. प्रभाग रचनेची गोपनीय माहिती फुटलीच कशी? असा सवाल किसन कथोरे यांनी केला आहे. “प्रशासकांच्या काळात पालिकेत मोठी लूट झाली. खोटी कामं दाखवून खोटी बिलं काढली”, असा गंभीर आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी प्रशासकांवर केला आहे.

    (सविस्तर बातमी अपडेट होत आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी कृपया आपलं वेबपेज रिफ्रेश करा)

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा