Mumbai -Goa Highway Traffic Change: मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. जाणून घ्या…
रायगड जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना २३ ऑगस्टपासून बंदी करण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २९ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत, २ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ४ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत, तसेच ६ सप्टेंबरला स. ८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत बंदी आदेश राहणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
मोठी बातमी! घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना ‘नो एंट्री’; 4 दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?
रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: कल्याण शीळ रोडवरील वाहतुकीत 20 दिवसांसाठी बदल, काय आहे नवा निर्णय?
गणेशभक्तांसाठी महामार्गावरील सुविधा
- सुविधा केंद्रांवर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहनदुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा
- वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार, बालक आहार कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस, महिलांसाठी फिडींग कक्ष
सुरक्षेसाठी सतर्कता
- गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त
- या कालावधीत दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एटीबी व एटीसीची पथके नियुक्त
- सोशल मीडिया देखरेखीसाठी सायबर सेल सतर्क
- प्रतिबंधक कारवाई पूर्ण, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटीच्या बैठका. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम

