Pandharpur News : पावसामुळे पंढरपूर मध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गोट्यात वीजप्रवाह उतरल्याने गोठ्यातील गाईसोबतच एकाच घरातील दोन महिलांचा चटका लावणारा अंत झाला आहे.
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील ढवळे वस्तीतील रहिवासी असलेल्या रशिका विठ्ठल रेडे (वय 57) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे जाण्यास वाट धरली. गोठ्यात गेल्यानंतर गाईला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली. गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना सानिकाबाईंनाही वीजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पण नियती इतकी निष्ठूर असा खेळ केला की, काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या असता, त्यांनी पाहिले ती विजेचा धक्का बसून सानिकाबाईंचा मृत्यू झाला. मात्र नंतर त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचले होते. तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत आहेत. तर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
सोलापुरात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती. जाहिरातीचे होर्डिंग्ज काढायला गेलेल्या दोन तरुणांना वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोन कुटुंबाचा आधार हरपल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पण या मृत्यूला आता वादाची किनार लागली आहे. रविवारी सायंकाळीच दोघांच्याही पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण झाली. पण मृतदेह ताब्यात घेताना एका तरुणाच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली. तसेच मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी लावून धरली. यासाठी त्यांनी अंत्ययात्रा थेट पोलीस ठाण्यात आणली होती.

