Bhaskar Jadhav Slams Shivsena Eknath Shinde : गुहागरमधील वेळणेश्वर येथे झालेल्या सभेत भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेत्यांना थेट आव्हान दिले. ‘भास्कर जाधवला संपवणे तुमच्या बापाचेही काम नाही,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. रामदास कदम यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली.
भास्कर जाधव म्हणाले, ही अशी माणसं जेव्हा येतात तेव्हा त्यांना सांगा तुम्हीच सांगा (प्रकाश भोसलेंना उद्देशून) ‘भास्कर जाधवला संपवणं तुमच्या बापाचं काम नाही लक्षात ठेवा,’ अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी नेत्यांना सुनावले आहे. भास्कर जाधव यांनी आज रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता या मतदारसंघात जाधव विरुद्ध कदम असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे काय ‘बेस्ट’ नव्हे! एक पद अन् दोन आदेश; फडणवीस, शिंदे आमनेसामने; प्रशासन बुचकळ्यात
मला गर्व नाही मी कधीही मोठेपणा केला नाही अजिबात नाही पण भल्याभल्यांना सांगतो ते मी तुम्हाला सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत भास्कर जाधव पाठ जमिनीला लावणार नाही. आता सगळ्यांबरोबर संघर्ष करणार आहे सोडणार नाही कोणाला येथील खारवी समाजाचे सभागृह बांधले आता ते सभागृह पाडण्यासाठी 2024 च्या जूनमध्ये पंचनामा झाला आणि आणि जिला तुम्ही डोक्या उचलून घेतलं तिच्याच नवऱ्याने ही तक्रार केली आहे हे ऐकून ठेवा आता मी कोणालाही सोडणार नाही सगळ्यांची कुंडलीच काढणार आहे एकेकाची असे शब्दात भास्कर जाधव यांनी पक्ष सोडून गेलेल्या सूचक इशारा दिला आहे.
आता मी ठरवलंय संघर्ष करायचा काय करायचं ना अशी ही साद त्यांनी कार्यकर्त्यांना घालत त्यांचाही कौल घेतला जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना असं सांगत. त्यांनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्या रामदास कदमच्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तो वेडा झाला आहे तुम्हाला माहिती आहे की नाही आणि आता रामदास कदम नाही म्हणायचं तर बामदास छमछम मी तर रामदास कदम बाबत फार काही बोलत नाही असं सांगत जहरी टीका केली आहे.
राष्ट्रवादी येण्यासाठी रामदास कदम आपल्या पाया पडले व मला विरोध करू नको मला राज्यमंत्रीपद देत आहेत पण मला हवय कॅबिनेट मंत्रीपद पण मी म्हणालो मी कोणाला विरोध करणार नाही तुझ्या नशिबात असेल तर तुला मिळेल माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल असं सांगत दुसरा एक किस्सा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातला आहे असं सांगत सहज म्हणून मला त्यांनी भेटायला बोलावलं आणि मी गेलो यावेळी रामदास कदम रडत होते अशी त्यांची रडण्याची ॲक्शन करत हा बामलाव्या हा बंगाली बाबा मला वाटले याच्या अंगात आलं की काय आणि म्हणाले माझे संपले सगळे आता पोरगा तुमच्या पदरात टाकतो संभाळा…तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या पाया नाही पडलो या खाजगीतल्या गोष्टी बोलायचं नसतात पण तुम्ही जेव्हा चार वेळा बोलता तेव्हा एकदा बोलावं लागतं असेही भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना सुनावला आहे.
भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेला आता रामदास कदम कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

