Devendra Fadnavis On Maharashtra Fisheries: आता मत्स्य व्यावसायिकांनाही शेतकऱ्यांना मिळणारी कर्जे उपलब्ध होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे , खासदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते. ‘महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमाफीचा लाभ देणार आहे. शेतकऱ्यांना यापुढे दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यासाठी अमलात आणली जात आहे. ही योजना डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण होईल’, असे फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: बेशिस्तपणा चालणार नाही! CM फडणवीसांची वाचाळ मंत्र्यांना तंबी; कठोर कारवाईचा इशारा
‘राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आहेत. यापुढे एक हजार लोकवस्ती असणाऱ्या गावांना शहरापर्यंत जोडण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी वीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत १३ लाख घरे बांधण्यात आली. सुमारे दोन लाख लाभार्थ्यांना भूखंड व त्यावर घरही बांधून देण्यात येत आहे. या माध्यमातून महाराष्ट्र बेघरमुक्त करण्यात येणार आहे’, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महापालिकेच्या 25 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्घृणपणे संपवलं; जीव गेल्यानंरतही थांबले नाहीत, दगडाने…
चपट्या पायाच्या लोकांकडून दगाबाजी : राणे
देवेंद्र फडणवीस हे २०१९मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार होते. पण, चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्याने दगाबाजी झाली. आम्हाला जनादेश मिळाला होता, पण त्या लोकांनी हिंदुत्वाशी बेईमानी केली. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजनही तेव्हाच होते. आता उशिरा का होईना भूमिपूजन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. आता दोन वर्षातच या महाविद्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
चिखलदरा केंद्रबिंदू ठरवून विकास : बावनकुळे
दिव्यांगांना अडीच हजार रुपये महिना मदत देण्यात येत आहे, तर कर्जमुक्तीची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येणार आहे. शेतावर जाण्यासाठी पांदण रस्ता तयार करून शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. येत्या काळात चिखलदरा परिसराला पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरवून विकास करण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

