• Sat. Mar 7th, 2026

    बंदुकीचा धाक दाखवून वर्दीतल्या नराधमाने महिलेचे ‘तसले’ फोटो काढले अन्…

    बंदुकीचा धाक दाखवून वर्दीतल्या नराधमाने महिलेचे ‘तसले’ फोटो काढले अन्…

    Police Assault On Woman : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने बंदुकीच्या धाकावर महिलेवर अत्याचार करत तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नराधम पोलिस अजूनही मोकाट आहे.

    (फोटो– Lipi)

    दिपक जाधव, बीड : बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावलेली असताना सामान्य नागरिक पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आहेत. परंतु एका पोलिसानेच केलेल्या दुष्कृत्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. येथील एका पोलिस अधिकाऱ्यानेच महिलेवर अत्याचार केला. इतकेच नाही, तर या नराधमाने तीचे नग्नावस्थेत व्हिडिओही काढले.

    मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र शिंदे नावाच्या या पोलीस उपनिरीक्षकाने त्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवला. शिवाय तिला तिचे कपडे काढायला सांगितले. नराधम पोलिस एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तिचे नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडिओही काढले. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीला तत्काळ अटक करुन कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
    ‘प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ, मुलीचा व्हिडीओ पाठवत…’; पुणे पोलिसांची कोर्टात माहिती
    शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, रवींद्र शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. रक्षकच भक्षक बनले, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटली आहे. या दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने महिलेला मारहाण देखील केली, असा आरोपही करण्यात आला आहे. महिलेने याबाबत तक्रार करुनही आरोपी रवींद्र शिंदे अजूनही मोकाट आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
    Vasai Crime : वसईत 15 दिवसात तीन उच्चशिक्षित तरुणांनी आयुष्य संपवलं, तिघांमध्ये समान धागा, 21 वर्षीय युवकाने तर मोबाईल…
    संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुंडाराज समोर आला. अत्यंत हाल हाल करुन देशमुखांचा जीव घेतला गेला. या घटनेनंतर बीडमधील अशाप्रकारच्या मारहाणीचे बरेच प्रकार समोर आले. अशा परिस्थित सामान्य नागरिकांचा ज्या न्यायव्यवस्थेवर आणि कायद्याच्या रक्षणकर्त्यांवर जो विश्वास होता तोही या घटनेने उडाल्याचे चित्र आहे. माणसाचा जीव, त्याची अब्रु इतकी स्वस्त झाली का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कन्सलटंट म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा