Chhatrapati Sambhajinagar citizens threaten administration: हर्सूलमध्ये रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी मोबदला न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने चर्चा आयोजित केली, परंतु तोडगा न निघाल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. योग्य मोबदल्याची मागणी करत नागरिक आक्रमक झाले आहेत.
ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे त्या ठिकाणी पोलिस आणि महापालिकेच्या यंत्रणांनी नागरिकांची बैठक घ्यावी, अशी सूचना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी (३० जुलै) हर्सूल पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या गजानन महाराज मंदिरात बैठक झाली. या बैठकीला सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ, अतिक्रमण हटाव विभागाचे संजय सुरडकर, वॉर्ड अधिकारी अशोक गिरी उपस्थित होते.
Chatrapati Sambhajinagar : मैत्रिणी रुममधून बाहेर गेल्या, नंतर मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग… बी फार्मसीच्या तरुणीने आयुष्य संपवलं, काय घडलं?
या बैठकीत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. ऐन पावसाळ्यात पाडापाडी कशासाठी? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जाणार, हाही प्रश्न आहे. टीडीआर म्हणजे काय, हे आम्हाला माहिती नाही, टीडीआर विकण्याची पद्धत माहिती नाही. हर्सूल गावातून जाणारा शंभर फूट रुंद रस्ता सध्या पुरेसा आहे मग दोनशे फुट रुंद रस्त्याची गरज काय आहे, जी २० परिषदेच्या वेळी या भागातील घरे, दुकाने पाडण्यात आली. त्या वेळी नियमानुसार मोबदला दिला. आता मोबदला न देता एकदम मार्किंग केले जात आहे.
अनेकांकडे बांधकाम परवानगी असताना त्यांना मोबदला न देता मार्किंग केली जात आहे. जागेच्या मोबदल्याबद्दल कुणीच काही बोलायला तयार नाही. केवळ दहशत माजवली जात आहे. रस्त्यात सुमारे दीडशे मालमत्ता बाधित होत आहेत, त्यापैकी पन्नास टक्के मालमत्ताधारकांच्या निवासाची समस्या निर्माण होणार आहे, त्यांना राहण्यासाठी घर नाही. त्यामुळे मोबदला न देता पाडापाडी केली तर या भागातील मालमत्ताधारक सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा नागरिकांनी दिला.
मुंबई ते मालेगाव घटनांचा उल्लेख, सुरक्षा यंत्रणांना थेट सवाल, इम्तियाज जलील संतापले
या बैठकीस अंकुश औताडे, संजय भगुरे, संदीप भगुरे, सुरेश औताडे, नरेंद्र औताडे, युनूस पटेल, बाळासाहेब औताडे, संजय औताडे, दिनेश औताडे, मनोज जाधव यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
