• Sat. Mar 7th, 2026
    बाबू धीरज रखो, सब ओपन होगा; हनी ट्रॅपप्रकरणी वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा

    Vijay Wadettiwar On Girish Mahajan: बाबू धीरज रखो जरा, सब ओपन होगा, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला.

    wadettiwar vs mahajan (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: हनी ट्रॅप सीडीमध्ये कोण आहे ते आम्ही दाखवू, सगळे उघड होईल, ‘बाबू धीरज रखो जरा, सब ओपन होगा’, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला.

    सीडी कुठे गायब झाली, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला होता. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हनी ट्रॅपमध्ये नाशिक, पुण्यातील आहेत. सरकारचा खेळखंडोबा चालला आहे. कितीही आरोप झाले तरी बेशरमाच्या झाल्याप्रमाणे आहेत.
    Devendra Fadnavis: शहरी माओवादी पुन्हा सक्रिय; कोलकाता, बेंगळुरुत अड्डे असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
    ट्रॅपमध्ये अनेक बडे अधिकारी आजी-माजी मंत्री फसले आहेत. लोढाने अनेकांकडून पैसे घेतले. किमान दोनशे कोटी रुपये वसूल केल्याची माहिती आहे. तो कुणाचा कार्यकर्ता आहे, त्यावर बोलणार नाही. झाकलेले चेहरे लवकरच बाहेर येतील, असेही वडेट्टीवार म्हणाले. नगरविकास खात्यात मुख्यमंत्र्यांची सही लागणार, याकडे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्री आता सर्वच ठिकाणी बॉस आहेत. नागपूरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वाधिकार त्यांनी आपल्या हातात ठेवले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
    सुनील तटकरेंच्या सांगण्यावरुनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
    एक मिनिटही ठेवू नये
    शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे, सभागृहात रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सरकारला आवडत असल्यास कारवाई करू नये, अन्यथा त्यांना एक क्षणही पदावर ठेवू नये, असा हल्ला विजय वडेट्टीवार यांनी चढवला.
    खेळता-खेळता चिमुकल्याशी वाद, मध्यरात्री गेले अन्…, जालना आश्रमशाळेतील 2 अल्पवयीन मुलांचं भयंकर कृत्य
    वसतिगृहातील मुली असुरक्षि
    राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे असताना तिथेच मुली सुरक्षित नाहीत. मुलींच्या वसतिगृहात शिरून आरोपींनी विनयभंग केला. या वसतिगृहात पुरेशी सुरक्षा नाही, सीसीटीव्ही नाही, कोणाच्या भरवश्यावर मुली इथे राहतील? या मुलींचे मोबाइल चोरले गेले. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का, वसतिगृहातील मुली प्रचंड घाबरल्या असून त्यांना सुरक्षेची हमी कोण देणार, असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमातून केले. आरोपींना तत्काळ अटक करावी, मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवावी, तत्काळ सीसीटीव्ही बसवावे, तसेच राज्यातील सर्व मुलींच्या वसतिगृहात खबरदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा