• Mon. Mar 9th, 2026

    मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, विद्यार्थिनीसाठी कर्कटक ठरले शस्त्र

    मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, विद्यार्थिनीसाठी कर्कटक ठरले शस्त्र

    Thane News : ठाण्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणात तपास हा सुरू आहे.

    (फोटो– Lipi)

    ठाणे : अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नातील रिक्षाचालकास ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. असगर अली शाबीर अली शेख (वय 35) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन तरुणी बुधवार 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली असता रिक्षा रामनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील शाळेजवळ आली असता विद्यार्थिनीने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले.

    विद्यार्थिनीने रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितल्यानंतरही तो थांबला नाही आणि पुढे घेऊन जात त्याने मुलीशी जबरदस्ती केली. त्यावेळी प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने स्कूल बॅगमधील कंपास पेटीमध्ये असलेले कर्कटकने रिक्षावाल्यास मारून शेजारील बसलेल्या त्याच्या साथीदारास धक्का मारून रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेत विद्यार्थिनी शाळेत पोहचली. त्यानंतर घरी आल्यावर तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला.
    Kalyan News : भयंकर! लिपस्टिक आणि जेल लावून अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, कल्याण रेल्वे स्थानकातून नराधमाला अटकशुक्रवारी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशा दोघांविरोधात भान्यासं कलम 137 (2), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यार्थिनीने दिलेल्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला होता. त्यातच गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 13 जुलै रोजी फातिमानगर येथे सापळा रचून रिक्षा चालकास ताब्यात घेऊन अटक केली असून रिक्षा चालक त्याच परिसरात राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

    नांगर खांद्यावर.. कर्जमाफीसाठी मंत्रालयाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली, आव्हाडांचा फोन!

    दरम्यान रिक्षा चालकास 14 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तर रिक्षा चालकाने सदर अपहरणाचा प्रयत्न का व कशासाठी केला ? याबाबत पोलिस तपास करत आहेत. तसेच त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत स्वत:ची सुटका करून घेतली. पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अजून काही खुलासे होऊ शकतात? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा