हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं. या आधी काढण्यात आलेले दोन्ही जीआर हे रद्द करत असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. ठाकरे बंधुंनी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्याआधी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून…हिंदी सक्तीचे दोन्ही शासननिर्णय रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.जीआर रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये मनसे नेत्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.