Rohit Pawar Slams minister Manikrao Thackeray : कृषीमंत्री तर राज्यात कुठे दिसत नाहीत आणि टीव्हीवर दिसतात तेव्हा वादग्रस्त स्टेटमेंट करताना दिसतात. टीव्हीवर दिसणं आणि बांधावर दिसणं यात फरक आहे, अशी खोचक टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे.
‘तुम्ही एकदा काँग्रेसला विचारायला हवं’
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. यानंतर या ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती देण्यासाठी केंद्रीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना स्थान देण्यात आले आहे. यावरून काँग्रेसमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू असून यासंदर्भात बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, काँग्रेसचे खासदार त्यामध्ये आहेत, मात्र काँग्रेसचे खासदार घेत असताना तुम्ही एकदा काँग्रेसला विचारायला हवं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. शशी थरूर यांचं नाव कसं आलं हे माहित नाही. मात्र शशी थरूर यांना भारताची भूमिका घेण्यासाठी नियुक्त केलं असेल तर त्यांनी भारताचीच महत्त्वाची आणि एक समान भूमिका घ्यावी, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
Sambhajiraje Chhatrapati : ‘विधानसभा निवडणुकीत इतके फटके बसले की…’ संभाजीराजे छत्रपतींनी केली खदखद व्यक्त, पुढील भूमिकाही सांगितली
रोहित पवार पुढे म्हणाले, बीडमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीमध्ये आता आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. बीडमधील हा व्हिडिओ अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या काही महिन्यांत तेथील पोलीस प्रशासनावर बऱ्यापैकी वचक बसलेला आहे. मात्र तेथील काही पूर्वीचे नेते आणि टोळीला लागलेली सवय मोडायला वेळ लागत आहे. पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांनी जो वचक पोलिसांवर आणला आहे, तो कमी पडत असून कायदा सुव्यवस्थेची वचक सर्वांवर असायला हवी, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
तर रोहित पवारांनी पालकमंत्री पदाच्या वादावरही प्रतिक्रिया दिली. ‘रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय सुटेल असा वाटत नाही, यांच्यात वाद होत राहतील एकमेकांविरोधात बोललं जातील, पालकमंत्री नसल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात अडचणी जाणवू लागले आहेत. महायुतीमधील नेते आपापसात लढत बसले आहेत. मुख्यमंत्री का निर्णय घेत नाहीत हे कळत नाही, दोन्ही मित्र पक्षांमध्ये हा वाद चालू रहावा असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल म्हणून अधिकार असताना सुद्धा तो निर्णय घेत नाहीत, नाशिकमध्ये देखील आता महाकुंभ होणार आहे तेथे सात-साडेसात हजार कोटी रुपये खर्च येणार आहे त्यामुळे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःकडे जबाबदारी घेतील असेल असं वाटतं. मात्र 2029 च्या निवडणुकीपूर्वी हे सर्व विषय संपतील’ असे मत आमदार पवारांनी व्यक्त केले.
रोहित पवारांकडून अमित ठाकरेंचं कौतुक
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात राजकीय पक्षांकडून तिरंगा रॅली काढण्यात येत आहे याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत आमदार रोहित पवार यांनी ‘अमित ठाकरे जे बोलत आहेत ते योग्य आहे’ असे म्हटले आहे. तिरंगा रॅली काढत असताना राजकीय स्टंट केला जात आहे, असं वाटत आहे. देशातील नागरिक जे सुरक्षित आहेत ते केवळ इंडियन आर्मी आणि एअर फोर्स व नेव्ही मुळे, अशा रॅली काढून काय साध्य करायचं आहे हे माहीत नाही मात्र ही रॅली काढून जर क्रेडिट द्यायचा असेल तर ते केवळ जवानांनाच मात्र हे इव्हेंट करताना राजकीय स्टंट दिसत आहे… काही नेत्यांकडून भारतीय जवानांना क्रेडिट देण्यापेक्षा नेत्यांना क्रेडिट दिला जात आहे..युवा पिढीमध्ये अमित ठाकरे युवा नेते आहेत मी त्यांचा अभिनंदन करतो, त्यांनी पत्र लिहून आपलं धाडस दाखवलं आहे.

