• Sat. Mar 7th, 2026

    Thane News: पुरुष-महिलांनंतर आता तृतीयपंथीही रिक्षाचालक! ठाण्याच्या करीना आडे प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

    Thane News: पुरुष-महिलांनंतर आता तृतीयपंथीही रिक्षाचालक! ठाण्याच्या करीना आडे प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

    Thane News: करिना आडे ह्यांनी ठाण्यात ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला असून त्या राज्यातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षाचालक ठरल्या आहेत.

    trans gender auto driver (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : शहरामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेली पुरूष रिक्षाचालकांची मक्तेदारी महिला रिक्षाचालकांनी मोडून महिला सुरक्षेला प्राधान्य दिले. आता ठाण्यात ई-रिक्षांचे पदार्पण होत असून या माध्यमातून एका तृतीयपंथी रिक्षाचालक प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. करिना आडे ह्यांनी ठाण्यात ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला असून त्या राज्यातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षाचालक ठरल्या आहेत. यासाठी रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

    पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहनांना मोठी पसंती मिळत असली तरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षासारख्या वाहनांमध्ये याचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपात होता. अजूनही राज्यात मोठ्या संख्येने ई-रिक्षा चालवल्या जात नसल्याने याची दखल घेत समर्थ भारत व्यासपीठ, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी आणि अॅटॉस इंडिया कंपनीच्या पुढाकाराने ठाण्यातील विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक १५ महिलांना मोफत ई-रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवारी ५ जींना ई-रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅज व ई-रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत.
    Monsoon Update 2025: महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचं आगमन? IMDचा मोठा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट
    जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, रोटरीचे जिल्हा गव्र्व्हनर दिनेश मेहता, सहाय्यक मानसिंग खाडे यांच्या उपस्थितीत नौपाड्यातील रोटरी सेंटर येथे रिक्षावाटपाचा कार्यक्रम झाला. रिक्षा वाटपाच्या पहिल्या टप्प्यात तृतीयपंथीय करीना आडे हिच्यासह सविता रणपिसे, रत्नावली जाधव, संगीता मांजरेकर, उज्वला शिंदे या महिलांना मोफत रिक्षांचे वाटप करण्यात आले. पुढील टप्पा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी होणार आहे. त्यावेळेस उर्वरित ११ महिलांना रिक्षावाटप करण्यात येणार आहे.

    ‘समर्थ रिक्षा, आदर्श ठरतील !’
    ठाणे परिसरात गेल्या काही महिन्यात जवळपास २० जणांचा अपघाती मृत्यू झाला. वाहतुकीचे नियम चालकांनी पाळले तर अनेक घरातील कर्ती व्यक्ती अपघातातून मृत्यूमुखी पडण्यापासून वाचेल. महिला रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करतील आणि समर्थ रिक्षा या आदर्श रिक्षा ठरतील, असा आशावाद वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
    लग्नसोहळ्यावरुन परततांना भीषण अपघात; नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू, पाच जखमी
    कोण आहेत करीना आडे?
    तृतीयपंथीय समाजाला आदर्श जीवनपद्धतीची वाट दाखवण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून करीना आडे ओळखल्या जातात. त्या राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय टॅक्सीचालक असून विविध कॉलसेंटरला कर्मचारी वर्गाला ने-आण करण्याची नोकरी त्या अनेक वर्षांपासून करतात. त्या ट्रकही चालवतात. त्यांनी तीन मुलींना दत्तक घेतले आहे. काही काळ उरण येथे कॅन्टींगमध्ये काम केले. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यांतर राहायला घर नसल्याने सध्या मैत्रिणीकडे राहत असून दहावीच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. एसटी बस सेवेत संधी मिळावी म्हणून वाहनचालकाचा बॅच काढला परंतु नोकरी मिळाली नाही. त्यामुळे समर्थ भारतकडून त्यांना रिक्षा देऊन त्यांना पायावर उभे राहण्यासाठी सहाय्य केले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed