Monsoon Update 2025: यंदा देशात मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आधी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. २८ मे (अधिक-उणे चार दिवस) असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रामध्ये २१ मे च्या सुमारास एका चक्रीय वातस्थितीची निर्मिती होऊ शकते. या प्रभावाखाली याच क्षेत्रामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन ही प्रणाली उत्तरेकडे प्रवास करू शकते. ही प्रणाली अधिक तीव्र होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे १९ ते २५ मे या कालावधीत राज्यात पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर पावसाच्या हजेरीसोबतच कोकणात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी संध्याकाळी माहिती दिली.
लग्नसोहळ्यावरुन परततांना भीषण अपघात; नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू, पाच जखमी
यंदा देशात मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आधी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. २८ मे (अधिक-उणे चार दिवस) असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी १७ मे रोजी मान्सून श्रीलंकेपर्यंत पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मालदीपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याच्या मॉडेलवरून मान्सून २७ तारखेच्या आधीही दाखल होऊ शकतो, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या वेळीच मान्सून आगमनही होऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. २७ आणि २९ मे दरम्यान मान्सून आगमनाची शक्यता आहे, असे स्कायमेट संस्थेचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.
टीआरपीसाठी धडपड, आव असा आणताहेत, जणू ते स्वातंत्र्यवीरच; नीलम गोऱ्हेंची राऊतांवर टीका
महामुंबईला यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर येथे रविवारपासून यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात, तसेच नाशिक, कोल्हापूर, सातारा, मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवस यलो अलर्ट आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे रविवारसाठी ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईत शनिवारी सकाळी मेघगर्जना आणि हलक्या सरींची हजेरी होती. कुलाबा येथे शनिवारी दिवसभरात १४ मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Nashik News: पांडवलेणीवर सरावादरम्यान पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; पाय घसरुन पडल्याने झालेली दुखापत
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले, तर मान्सूनचा पुढचा प्रवास काहीसा बाधित होऊ शकतो. मात्र, या प्रणालीच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात पाऊस असल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा. – कृष्णानंद होसाळीकर, निवृत्त अधिकारी, हवामान विभाग

