• Sun. Jun 14th, 2026

    Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार का? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा खुलासा

    Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार का? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा खुलासा

    Devendra Fadnavis on Municipal Elections : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी निवडणुका घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये महायुती एकसंघपणे लढणार का? याबाबत खुलासा केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अहिल्यानगर : महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा तापणार आहे. कारण गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांना सातत्याने स्थगिती येत होती. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी सुरु राहील. आधी रखडलेल्या निवडणुका घेणं महत्त्वाचं असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल आता कधीही वाजू शकणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता आहे. महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडी पाहता स्थानिक पातळीवर महायुती या निवडणुकांना एकत्र सामोरं जाणार का? याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामहायुती एकत्र लढणार असल्याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिेंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र पत्रकार परिषदेत बसले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये देखील तशी मोर्चेबांधणी सुरु आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहिजे तशी मैत्री दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण फडणवीसांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.

    देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आणखी काय म्हणाले?

    “आम्हाला अतिशय आनंद आहे की, सुप्रीम कोर्टाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आम्हाला परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की, निवडणूक आयोगाने तयारी करावी”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed