• Sun. Mar 8th, 2026
    संजय शिरसाट मुख्यमंत्री झालेले चालतील पण अजित पवार नको; ओबीसी नेत्याची ठाम भूमिका

    Ajit Pawar CM- जित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यावर अनेकांची प्रतिक्रिया आली.राज्यातील ओबीसी नेत्याने अजित पवार मुख्यंत्री होऊ नयेत अशी भुमिका घेतली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जालना: अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यावर अनेकांची प्रतिक्रिया आली. ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याला कडवा विरोध केला आहे. त्यांनी संजय शिरसाट, अतुल सावे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे मुख्यमंत्री झालेल्या चालतील पण अजित पवार नको अशी भुमिका घेतली.

    अजितदादांना राज्यात जातीयवाद पसरवायला मुख्यमंत्री करायचे आहे का?
    ते म्हणाले, अजितदादांना राज्यात जातीयवाद पसरवायला मुख्यमंत्री करायचे आहे का? अजित दादा ओबीसींच्या महामंडळाला निधी देत नाहीत. अजित दादा सर्व योजना बंद करतात. गोरगरीबांच्या पोटात काही जात असेल अशा छोट्या मोठ्या योजनाही बंद करण्याचा विचार करतात. त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. म्हणजे तुम्ही गोरगरीबांना जे 18 पगड जातीतील 12 बलुतेदार असतील, एससी असतील, एसटी असतील यांच्यावर तुम्ही अन्याय करत असाल तर तु्म्हाला मुख्यमंत्री कसे व्हावे असे वाटते. यांच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? अजितदादा हे मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राला परवडणार नाहीत.

    अजितदादांनी ओबीसीच्या तोंडाला पाने पुसली
    पुढे म्हणाले, अजितदादांऐवजी भुजबळ साहेब मुख्यमंत्री झालेले चालणार नाहीत का. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळ साहेब. राष्ट्रवादीला भुजबळ साहेबांमुळे आणि ओबीसीच्या अनेक नेत्यांमुळे यश आले आहे. अजितदादांनी ओबीसीच्या किती नेत्यांना न्याय देण्याचे काम केले. भुजबळ साहेबांना मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. आणखी काही नेते आहेत त्यांना विधानपरिषद असेल किंवा एखादे महामंडळ देण्याचे काम केले नाही. त्यामुळे अजितदादांनी ओबीसीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आता एससी आणि एसटीच्या खात्यातील पैसे वळण्याचे काम करुन लाडक्या बहिणीला देण्याचा मोठेपणा दाखवला. परंतु इकडे गोरगरीब समाजावर अन्याय करण्याचे काम केले. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे हे आम्हाला मान्य नाही.खरंतर राष्ट्रवादीतून भुजबळसाहेबांचा नंबर लागला पाहिजे.

    आम्हाला संजय शिरसाट मुख्यमंत्री झालेले चालतीत
    भाजपमधून सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. येणाऱ्या काळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री झालेल्या आम्हाला चालतील. परंतु दादा मुख्यमंत्री झालेले चालणार नाही. अतुल सावे मुख्यमंत्री चालतील. आम्हाला संजय शिरसाट मुख्यमंत्री झालेले चालतीत कारण की छोट्या मोठ्या घटकांना मुख्यमंत्री करायचे काम सर्वाचे असते. सर्वात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. तुम्ही एससी एसटीचा मुख्यमंत्री केला पाहिजे. अशी भूमिका वाघमारे यांनी घेतली.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed