• Wed. Mar 11th, 2026
    Heatstroke Alert! राज्यात उष्माघाताने तीन संशयितांचा मृत्यू; दोन महिन्यांत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण

    Heat Stroke Death In Maharashtra: मार्च महिन्यात नागपूरमधील उष्माघातांच्या तीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही संख्या वाढून दहा झाली तसेच तीन संशयित मृत्यूंची नोंदही करण्यात आली आहे.

    heatstroke (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असून उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे तिघेही नागपूरमधील आहेत. तसेच मागील दोन महिन्यांत उष्माघाताचे १०१ रुग्ण आढळले असून मार्चपेक्षा एप्रिल महिन्यामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्चमध्ये ३० रुग्ण आढळले होते तर एप्रिल महिन्यात ७१ रुग्णांची नोंद झाली आहे.

    आरोग्याच्या तक्रारींमध्येही मागील काही दिवसांपासून वाढ झाल्याचे दिसते. त्वचाविकार, पोटदुखी, जुलाब-उलट्या होणे, डोकेदुखी तसेच चक्कर येणे, दम लागणे, अंगावर पुरळ उमटणे याप्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणत्या नियमावलीचे पालन करायला हवे, याचे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहे. मार्च महिन्यात नागपूरमधील उष्माघातांच्या तीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही संख्या वाढून दहा झाली तसेच तीन संशयित मृत्यूंची नोंदही करण्यात आली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकाही उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झालेली नाही.
    Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
    ‘कडक उन्हामध्ये गरज नसताना बाहेर पडू नये. सहआजार, गर्भवती तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी’, असे आरोग्यसेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले.
    निम्म्या नाशिकवर बांधकाम मर्यादा; एचएएल विमानतळ, आर्टिलरी सेंटरमुळे येणार निर्बंध, काय कारण?
    उष्माघाताने घेतला शेतकऱ्याचा बळी
    नाशिक : शेतात काम करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शेवगेदारणा (ता. जि. नाशिक) येथे शुक्रवारी दुपारी घडली. जगदीश रघुनाथ कासार (४३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जगदीश कासार शेतात नवीन जलवाहिनीचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास त्यांना कामाच्या ठिकाणी शेतातच उलट्यांचा त्रास झाला. त्यानंतर सायंकाळी उलट्यांचा त्रास वाढल्याने त्यांना प्रथम पळसे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed