सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात एक दुर्दैवी घटना घडली. मामाबरोबर पोहायला गेलेल्या भाचीचा बुडून मृत्यू झाला. आराध्या कोरडे (वय १०) असे मृत मुलीचे नाव आहे. ती इस्लामपूरची रहिवासी होती. उन्हाळी सुट्टीत ती मामाकडे आली होती. मामा आणि भाची धरणात पोहत असताना आराध्याला पाण्याच्या लाटांचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
चिमुरडी मामासोबत फिरायला गेली, उकाड्याने हैराण म्हणून धरण परिसरात आले, अन् अचानक…
