प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.’फडवणीस साहेब बोला नाहीतर मारणार टोला’ अशा शब्दात कडूंनी फटकारलं. अकोल्यात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गौरव सोहळ्यात बच्चू कडू बोलत होते.यावेळी त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना देखील टोला लगावला. दादांची दादागिरी किती आहे यावर बारामतीत कानउघडणी असा इशारा त्यांनी दिला. पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली.