• Tue. Jun 9th, 2026
    पाकिस्तानवर हल्ला झाल्यावर उबाठा रडत बसतील, शिंदेंच्या नेत्याने ठाकरेंना डिवचलं

    Sanjay Shirsat on Thackeray Party : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोदींवर टीका केली की त्यांच्यात राजकीय इच्छाशक्ती नाही. या टीकेला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, राऊतांना राजकीय ‘लवलेश’ नाही, लवकरच मोदी पाकिस्तानवर कारवाई करून त्याला जगाच्या नकाशावरून गायब करतील, असा विश्वासही शिरसाटांनी व्यक्त केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लवकरात लवकर हल्ला करावा अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनीही पाकिस्तानवर हल्ला करावा, आमचा पाठिंबा असल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, असं म्हणत राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    राजकीय लवलेश नाही यांना, यांच्या पेक्षा ओवेसी बरा आहे. याचा राजीनामा घे म्हणतात, तुम्ही देशाबरोबर राहणार की नाही, ओवेसीकडून काही शिका यांना बैठकीत जाण्यासाठी वेळ नाही, उबाठा यांनी नीच पणा आहे, काँग्रेसकडून उबाठाने शिकले पाहिजे, त्यांना काय बोलावे, नीच शब्द माझ्या तोंडात येतो. पाकिस्तानवर हल्ला झाल्यावर उबाठा रडत बसतील, त्यांची लाचारी आहे. शिवसेनाप्रमुख यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, उबाठा आता मुस्लिम लिग झाले आहे. ओवेसी बैठकीत उपस्थित होते, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
    Sanjay Raut : ‘पवारांना अमित शाहांचा राजीनामा नकोय, तर मग…’; विलासराव, आबांची आठवण करून देत संजय राऊतांचा थेट सवाल

    संजय राऊतांना प्रत्युत्तर

    संजय राऊतला प्रशासन कळले नाही. घरात बसून प्रशासन चालवणे सारख नाही देश चालवणे सोपं नाही. घरात बसून आपण जसे सरकार चालवले तसं चालवले पाहिजे असं त्यांना वाटते. आमचं दरेगावला आहे, तुमचं लंडनला आहे. आम्ही कुठेही महाराष्ट्र बसून सरकार चालवू शकतो. लंडनला बसवून सरकार चालवणे असे मूर्ख आम्ही नाही, असं म्हणत शिरसाटांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी पाकिस्तानने भारताच्या गाण्यावर बंदी घालण्यावरही भाष्य केलं.

    दरम्यान, पाकिस्तान आमच्या गाण्यावर बंदी घातली बर केलं, आम्ही त्याचं पाणी बंद केलं. काही दिवसात पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसते का अशी कारवाई मोदी करतील. प्रत्येक भारतीय म्हणत आहे पाकिस्तानला धडा शिकवा, त्यानुसार मोदी पाऊलं उचलत असल्याचं शिरसाटांनी म्हटलं होतं. जात जनगणना झाली पाहिजे. अनेकजण आम्हाला एवढे टक्के पाहिजे म्हणतात. जनगणना झाल्यावर सर्व स्पष्ट होईल आणि कुणाला किती टक्के द्यावे हे स्पष्ट होईल. आरक्षण निर्णय एका पटीत येईल, असंही शिरसाट म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed