• Sat. Mar 14th, 2026
    आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यात पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांची माहिती

    Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मे महिन्यामध्ये मध्य भारतात, लगतच्या पूर्व, तसेच वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात पूर्वानुमान वर्तवले. मे महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत मुंबईमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. या महिन्यात उत्तर कोकण, विदर्भ, तसेच मराठवाड्याचा काही भाग येथे उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा अधिक असू शकतील.

    गुरुवारी आर्द्रता अधिक

    मुंबईमध्ये गुरुवारी तापमान ३५ अंशांच्या आत असतानाही असह्य उकाड्याने मुंबईकर हैराण झाले. कुलाबा येथे ३४.१ तर सांताक्रूझ येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.५ आणि ०.४ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ७० टक्क्यांहून अधिक, तर सांताक्रूझ येथे ६५ टक्क्यांच्या आसपास आर्द्रता होती. यामुळे अस्वस्थता वाढली आहे.
    Mumbai Road : रस्तेकामात त्रुटी आढळल्या, अभियंत्याला निष्काळजी भोवली, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड, मुंबई महापालिकेची निलंबनाची कारवाई

    स्कायमेट वेदरचा अंदाज काय?

    ढगांची द्रोणीय स्थिती, तसेच चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांमध्ये या तापमान तडाख्यामुळे मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्कायमेट वेदरचे महेश पलावत यांनी दिली आहे.
    Gold Rate : सोनं महागलं, पहिल्या तिमाहीत मागणी १५ टक्क्यांनी कमी; पण तरी खरेदीचा उत्साह का? एक्सपर्स्टने दिली माहिती

    आर्द्रता का वाढली?

    आग्नेय राजस्थानजवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय राजस्थानपासून उत्तर केरळपर्यंत उत्तर-दक्षिण डांची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता अधिक आहे. राज्यावर या प्रणालीचा परिणाम होत आहे. येते चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भामध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    Maharashtra Weather Forecast : आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती

    दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने गारपीट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. राज्यभरात सतत हवामानात कधी अवकाळी, तर कधी तापमानाच्या पारा ४० वर पोहोचल्याचं चित्र आहे. सध्या तापमान चांगलंच वाढलं असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed