ऑरेंज सिटीनंतर आता कोल्हापुरातल्या पिंक व्हिलेजने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.. हे आहे करवीर तालुक्यातलं शेळकेवाडी गाव, ज्याला ‘पिंक व्हिलेज’ म्हणून ओळखलं जातंय.. .जेमतेम 100 घरांचं हे गुलाबी गाव आहे.. लोकसंख्या कमी असल्यानं राजकीय नेत्यांकडूनही दुर्लक्षित होणारं हे गाव.. पण गावकऱ्यांनी मात्र आत्मनिर्भर बनत कमालच केलीय.. 100% सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाने शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय..