Raigad Dam News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक दुःखद घटना घडली. पाली भूतीवली धरणावर एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
२९ एप्रिल २०२५ रोजी मुंबई घाटकोपर येथील रिहान आसिफ अरब, वय १६ वर्षे, राहणार नारायण नगर, घाटकोपर पश्चिम, रेहान शकील अहमद शेख वय १६ वर्षे राहाणार असेल्फा घाटकोपर पश्चिम, वाहिद मुबारक मकानदार वय १६ वर्षे राहणार घाटकोपर आणि मनीष छोटेलाल कानोजिया वय १८ वर्षे राहणार घाटकोपर पश्चिम हिमालय सोसायटी, असे हे चार तरूण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणावर फिरण्यासाठी आले होते.
धरणाच्या पाण्यात हात-पाय धुण्यासाठी गेला आणि अनर्थ घडला –
दुपारी ३ वाजताच्या दरम्यान धरण पाहिला. तेथे मॅगी बनवून खाण्यासाठी सर्वजण धरणाकिनारी आले. मात्र ते हात – पाय धुण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यापैकी मनीष छोटेलाला कानोजिया हा खोल पाण्यात गेला. त्याला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला असल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, घाटकोपरमधील तरुणासोबत कर्जतमध्ये अनर्थ घडला, कुटुंबावर शोककळा
पोलिसांकडून तरुणाचा शोध
धरणात तरुण बुडाल्याची घटना समजल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. नेरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी खोपोली येथील टीमला पाचारण करण्यात आलं आणि बुडालेल्या १८ वर्षीय तरूणाचा शोध सुरू करण्यात आला. या शोध कार्यादरम्यान सदर तरूणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून, मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

