• Sat. Jun 6th, 2026
    Raju Shetti : शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं नसून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे, राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

    Raju Shetti in Parbhani : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष वेधले. हमीभावाचा कायदा न केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, यामुळे आत्महत्या वाढत आहेत, असे ते म्हणाले.

    raju shetti (फोटो– Lipi)

    धनाजी चव्हाण, परभणी : सोयाबीनला हमीभावाप्रमाणे ४८०० रुपये एवढा भाव मिळाला पाहिजे होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकांपूर्वी याच महायुती सरकारने हमीभावापेक्षा २० टक्के जास्त अनुदान शेतकऱ्यांना देऊ असा वायदा केला होता. सरकारच्या म्हणण्यानुसार सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळायला हवा होता. पण प्रत्यक्षामध्ये ३२०० ते ३५०० पर्यंतच सोयाबीनला भाव मिळाला. त्यामुळे तब्बल अडीच हजार रुपये प्रति क्विंटल नुकसान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावे लागले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ६५ लाख टन सोयाबीन विक्री केली आहे. प्रतिक्विंटल अडीच हजार प्रमाणे तब्बल १८ हजार कोटी रुपयांचं नुकसान या सरकारने महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं केलं आहे. केवळ हमीभावाचा कायदा न केल्याने महाराष्ट्रातला शेतकरी देशोधडीला लागला आहे आणि त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत, या आत्महत्या नसून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या हत्या असल्याचं, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.

    परभणी जिल्ह्यातील मान्सूना येथील भगवानराव टेकाळे आणि सचिन जाधव आणि ज्योती जाधव या शेतकरी दांपत्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि संपूर्ण शेतकरी कर्जमुक्तीसाठी आज माळसोन्ना येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, घाटकोपरमधील तरुणासोबत कर्जतमध्ये अनर्थ घडला, कुटुंबावर शोककळा
    पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज देखील फेडता येत नाही. निरोपोदी सारखं कर्ज बुडवण्याची या शेतकऱ्यांची इच्छा नाही. हा शेतकरी स्वतःचा जीव देईल पण कर्ज मात्र बुडवत नाही. त्यामुळे ज्यांनी या शेतकऱ्यांना आश्वासनं दिली आणि ती पूर्ण केली नाही त्यांच्या या चुकीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त झाला. अशांवर आता ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.
    Prati Tuljapur : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर खुले, देवी भक्तांची पहिल्याच दिवशी उसळली गर्दी
    केंद्र सरकारचा नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ही भूमिहीन शेतमजुरापेक्षा हालाखीची झाली आहे. शेतमजुरापेक्षा देखील शेतकऱ्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. म्हणूनच ही सत्य परिस्थिती सरकारला अवगत करून देण्यासाठी आम्ही आत्मक्लेष पदयात्रा काढत आहोत.

    Raju Shetti : शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं नसून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे, राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

    माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं, की आपण आत्महत्या करू नये. आपण लढत लढत म्हणूया आपण मरणाच्या दिशेने एक पाऊल टाकण्यापेक्षा आपण संघर्षाच्या दिशेने एक पाऊल टाकूया. या चोरांसाठी आणि दळभद्री राजकीय पुढार्‍यांसाठी आत्महत्या करू नका, असा सल्ला देखील यावेळी शेतकऱ्यांना दिला. सरकारने या शेतकऱ्यांवर अशी वाईट वेळ आणली आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गामध्ये बसून ढसाढसा रडत असतील, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed