• Tue. Mar 10th, 2026
    संतोष देशमुख प्रकरणी बजरंग बाप्पांची फडणवीसांकडे महत्वाची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 12:02 pm

    बीडचे जेलर नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी इथेच ठेवतात.यांना आणखी काही कट रचण्यासाठी एकत्र ठेवला आहे का? असा सवाल बजरंग सोनवणेंनी केला.संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं सोनवणे म्हणाले.आरोपींना कोणालाही पाठीशी घालणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे असं सोनवणे म्हणाले.एवढे आरोपी पकडले म्हणून दहशत मिटली किंवा यांचा गुंडाराज संपलं असं नाही असं बजरंग सोनवणे म्हणाले.बीड रेल्वेबाबत बोलताना ३१ मार्च २०२६ पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण करायचं आहे असं सोनवणे म्हणाले.रेल्वे इथून एकदा मुंबईपर्यंत न्यायची आणि तेथून मला रेल्वेत बसून दिल्लीला जायचंय असंही सोनवणे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed