Nagpur News : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांनी राज्यभर जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यातून रॅली सुरू होणार असून नागपूरमध्ये तिची सांगता सभेत होईल. निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शेतकरी, दिव्यांग आणि कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील.
बच्चू कडू म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळेच हे आंदोलन उभं करत आहोत. चर्चा आणि बैठकींनी काहीच साध्य होत नाही, म्हणून आता निर्णायक लढा उभा करायचा आहे. या आंदोलनाची सुरुवात साताऱ्याहून होणार असून पहिली सभा बारामतीत, त्यानंतर ठाणे आणि इतर शहरांमधून होत शेवटी नागपूरला मोठ्या जनसमुदायासह मोर्चा पोहोचणार आहे.
Vijay Wadettiwar : ‘धर्म विचारण्यासाठी दहशतवाद्यांना वेळ होता का?’; वादग्रस्त वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची सारवासारवएक ते दीड लाख लोकांसह आम्ही नागपूरमध्ये अंतिम सभा घेणार आहोत. शेतकरी, दिव्यांग आणि अपंगांसोबत हा लढा आम्ही लढणार आहोत, असं बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलं. याशिवाय, १४ मे रोजी सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी आम्ही मंत्र्यांना सांगू की, रक्त घ्या, पण रक्त सांडण्याची वेळ येऊ देऊ नका. यामध्ये जनतेला जागरूक करण्याचा आणि सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
बच्चू कडू यांनी अर्थभेदाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, आता चर्चांनी काही होणार नाही यापूर्वी मी रायगडला उपोषणाला बसलो होतो. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यानंतरही काही कारवाई होत नाही म्हणून या आंदोलन आम्ही करत आहोत. इथे अर्थभेद आहे, जाती आणि धर्मभेद पेक्षा अर्थभेद फार महत्त्वाचा आहे. आणि अर्थभेदामध्ये सर्व जाती धर्माचे लोक कष्टकरी सर्वच आर्थिक विषमतेने पिचले जात आहेत. हे आम्हाला लोकांना समजवायचं आहे. म्हणूनच हे आंदोलन केवळ मागण्यांसाठी नाही, तर जनजागृतीसाठीही आहे, असे देखील बच्चू कडू यांनी म्हटले.

