• Wed. Mar 18th, 2026
    Assaduddin Owaisi : ‘मोदी साहेब पॉलिटिशियन बनू नका, वक्फ हा काळा कायदा रद्द करावा,’ ओवैसींनी मोदींना ललकारले

    Assaduddin Owaisi on Waqf Ammendment Law : वक्फ कायदा हा काळा कायदा आहे आणि तो कायदा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी असदुद्दिन ओवैसी यांनी केली आहे.

    (फोटो– Lipi)

    धनाजी चव्हाण, परभणी : ‘पंतप्रधान मोदी यांचे मित्र उद्योगपती अंबानी यांचे भव्य असे घर वक्फ जमिनीवर उभे आहे. या घराला धोका होऊ नये आणि ही जागा आपल्या मित्राला म्हणजेच अंबानी यांच्याकडेच राहावी, यासाठीच वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईमध्ये त्यांचे जे आलिशान घर आहे ते घर वक्त जमीन विकत घेऊन उभारले आहे. ते घर आणि ती जागा आपल्या मित्राकडेच राहावी यासाठीच पंतप्रधान मोदी यांनी कायदाच बदलला, असा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे.

    खासदार असदुद्दिन ओवैसी म्हणाले, ‘वक्फ कायद्यानुसार देशातील सर्व संपत्ती ही अल्ला म्हणजेच ईश्वराच्या मालकीची असताना देखील या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आता ही सर्व जमीन कब्जे धारकांच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वक्फ कायदा हा काळा कायदा आहे आणि तो कायदा तात्काळ रद्द करावा.’ पंतप्रधान मोदी यांना माझा थेट सल्ला आहे की, ‘तुम्ही स्टेटमेंट बना पॉलिटिशियन बनू नका. वक्फ विधेयक रद्द करा आणि मुस्लिमांना त्यांचा हक्क द्या, असे म्हणत खासदार ओवैसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
    Husain Dalwai : ‘राज्यात पुन्हा पेशवाई, तिचा नायनाट आवश्यक’, हुसेन दलवाई यांचे वक्तव्य
    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने परभणीमध्ये आज वक्फ बिलाच्या विरोधात एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादासाठी एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर मोहम्मद खलील सैफला रहमानी अध्यक्ष ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड हे देखील उपस्थित होते.

    ओवैसी पुढे म्हणाले की, संसदेमध्ये मंजूर झालेले वक्फ बिल हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे. देशामध्ये अन्य धर्मीय जे आहेत त्यांच्या देवस्थानामध्ये ट्रस्टी म्हणून त्याच धर्माची लोक आहेत. पण या विधेयकाच्या मंजुरीनंतर मुस्लिमांच्या धार्मिक ट्रस्टमध्ये अन्य धर्मीयांचा देखील समावेश केला जाणार आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येक धर्मियांना आपल्या धर्मानुसार जगण्याचा हक्क आहे, अशी तरतूद घटनेत करण्यात आलेली आहे. पण केंद्र सरकारने घटनेच्या विरोधात जाऊन हे बिल पास करून घेतले आहे. त्यामुळेच आता हे बिल रद्द करावे, अशी आमची मागणी आहे. अन्य धर्मीयांना एक न्याय आणि मुस्लिमांना एक न्याय कसं चालेल, असेही ओवैसी म्हणाले.

    पुढे बोलताना बॅरिस्टर ओवेसी म्हणाले की पंतप्रधान मोदी साहेब तुम्हाला काय व्हायचे आहे ते सांगा तुम्हाला स्टेशन व्हायचे आहे की पॉलिटिशन व्हायचे आहे हे तुम्ही आधी ठरवा जर तुम्ही हे वक्त विधेयक रद्द केले आणि मुस्लिमांना न्याय दिला तर तुम्हाला स्टेशन म्हणून सर्वत्र गौरविण्यात येईल आणि जर तुम्ही हे वक्व विधेयक रद्द नाही केले तर मात्र तुम्ही फक्त पॉलिटिशियन म्हणूनच राहतात असे म्हणत आपण स्टेसमन व्हावे आणि हा काळा कायदा रद्द करावा अशी भावनिक साध्य केली यावेळी बॅरिस्टर ओवेसी यांनी घातली.

    वक्फ विधेयकावरून अजित पवारांचे तोंड बंद का?

    बॅरिस्टर ओवेसी यांनी विचारला सवाल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपले चुलते शरद पवार यांच्या विरोधात मोठमोठ्याने बोलणारे अजित पवार आज वक्त विधेयकावर काहीही बोलत नाहीत. अजित पवार तुम्ही गप्प का असा सवाल उपस्थित करत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल असे देखील खासदार ओवेसी म्हणाले. कालच अजित पवार हे परभणी दौऱ्यावर आले होते आणि शहरात सर्वत्र बॅनरबाजी होती आणि हे बॅनर पाहूनच ओवेसी यांनी अजित पवार यांना खडा सवाल विचारला आहे. अजित पवार यांच्यासोबतच नितेश कुमार चंद्राबाबू नायडू अजित सिंग यांना देखील वक्त विधेयकावरून टीका केली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed