• Sat. Mar 7th, 2026
    पुणे हादरलं; ना नाव ना चेहरा, छिन्नविछिन्न अवस्थेतील बॉडी पाहून अंगाचा थरकाप

    Pune Crime News: पुण्यात एक शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असून शीर नसल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.

    (फोटो– Lipi)

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे: भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगांव गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरगांवमधील दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त होत आहे.

    गुराख्यांना शीर नसलेला, हात-पाय बांधलेला मृतदेह आढळून आला

    या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगांव परिसरात काही स्थानिक गुराखी हे गुरे चारण्यासाठी डोंगराळ भागात गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी त्या परिसराची पाहणी केली. तेव्हा काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून आला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
    UP News: सात पुरुषांसोबत संबंध, दोन बंदुका; माझी पत्नी मुस्कानसारखी, मला मारुन टाकेल; भेदरलेला पती थेट पोलिसात

    शीर शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

    भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली आहे. मृतदेहाचे शीर नसल्याने आणि हातपाय बांधलेले असल्याने हा खून नियोजनबद्धरित्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शीर शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु आहे. मात्र, अद्याप या धडाचं शीर सापडलेलं नाही.

    Pune News: निर्जनस्थळी बॉडी, हात-पाय बांधलेले अन् शीर गायब, पोलिसांसमोर ओळख पटवण्याचं आव्हान, पुणे हादरलं

    स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

    वरंध घाट हा दुर्गम आणि कमी वर्दळीचा मार्ग असल्याने येथे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे आव्हानात्मक आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed