Maharashtra Politics : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी बोलताना जाहीरपणे सांगितलं की मी सरकारमध्ये कधीच कोणालाही फोन लावत नाही.
Nilesh Rane : मी सरकारमध्ये कुणाला फोन करत नाही, मदत मागायचीच तर… कोण आहेत निलेश राणेंचे खास मित्र?
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी बोलताना जाहीरपणे सांगितलं की मी सरकारमध्ये कधीच कोणालाही फोन लावत नाही. मला अन्य कोणाकडे जायची वेळच येत नाही. फोन लावलाच तर फक्त उदय सामंत याच एका माणसाला लावतो. काही मदत लागली तर याच माणसाला विचारतो. कधी कोणाकडे जात नाही, तशी गरजच पडली नाही, असं थेट जाहीरपणे सांगत निलेश राणे व उदय सामंत यांच्यातील ‘ही दोस्ती आता तुटायची नाय’ असेच स्पष्ट संकेत निलेश राणे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांनाही दिला आहे.
एकवेळ घरी बसेन पण शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही
ज्या अडचणीच्या काळात शिंदे साहेबांनी मला मदत केली, त्या शिंदे साहेबांना मी कधीच सोडणार नाही, एक वेळ घरी बसेन पण शिंदे साहेबांना सोडणार नाही, असं सांगत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल निलेश राणे यांनी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली.
काही लोक म्हणतात की निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार, अरे आयुष्यात कधी जाणार नाही, ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला हे त्यांचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, कशाला जाऊ मी दुसरीकडे, अरे मी घरी बसेन, पण मी माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, असेही राणे यांनी यावेळी जाहीर केलं. मला तरी तिकीट देईन सांगितलं ते दिलंही आणि निवडूनही आणलं अशा शब्दात शिंदे यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केलं.
Pahalgam Attack : माझा भाऊ धर्मयोद्धा, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याच्या बहिणीने गरळ ओकली, पोलिसांनी 20 लाखांचे…
हा पक्ष बांधला म्हणून विरोधक बिथरले
आम्ही इकडे हा पक्ष बांधला त्यामुळे आता सगळेच बिथरले आहेत. यावेळी त्यांनी कसातरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे, कशीतरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे, यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. पण कोणी किती प्रयत्न केले तरीही ते जे विरोधक माझ्यावर टीका करत आहेत त्यांना आता मला परत पराभूत करण्यासाठी 25 वर्षे वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही, या जिल्ह्यात तर नाही, कुठून तरी आयात करून काही आणलं तर मला माहित नाही अशा शब्दात नाव न घेता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना सुनावले आहे.
दहा वर्षानंतर पुन्हा जिवंत केले ते या जिल्ह्याने
मेहनतीने आलोय, कष्टाने आलो आहे, स्वतःला बदलून आलो आहे, लोकांसाठी खस्ता खालल्या आहेत, कोणी सांगितलं स्वभाव बदल, तोही बदलला, ते कशासाठी? माझ्या या सिंधुदुर्गसाठी… या सिंधुदुर्गने आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले म्हणून करायचं तर ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, बाकी कोणासाठी नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं. कारण दहा वर्षानंतर कुठला कोण माजी खासदार कुठे आहे माहित नाही, महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही, असा टोला नाव न घेता विनायक राऊत यांनाही लगावला. पण दहा वर्षाच्या वनवासानंतर या निलेश राणेला पुन्हा जिवंत केलं तर ते या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला म्हणून जे काही करायचं ते आता फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी.
Crime News : बायकोला निर्घृणपणे संपवलं, बॉडीजवळ मुलांना कोंडून पळ काढला; 8 वर्षांच्या चिमुरड्याने बापाला जन्माची अद्दल घडवली
मला आज शिंदे साहेबांसोबत भाषण करायचं होतं पण सामंत साहेब तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही, माझा शब्द आणि शब्द तुम्ही साहेबांपर्यंत पोहोचवाल, तुम्ही माझ्या बंधूसारखे आहात, असा विश्वास व्यक्त करत सामंत साहेब तुमचे प्रेम आमच्यावरती कायम असंच ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही तुमचे प्रेम राहू द्या, तुमच्याकडे एमआयडीसी खातं आहे, तुम्ही नेहमी सांगता की निलेश राणे फिरून फिरून महाराष्ट्राचे सगळे बोलतील पण येतील कुडाळ मालवणवरच म्हणूनच तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही मला मागे सांगितलं होतं निलेश तुला मला काहीतरी द्यायचे आहे, तुम्हाला जी काही घोषणा करायची आहे, ती आजच करा, अशीही मागणी निलेश राणे यांनी हसत सामंत यांच्याकडे यावेळी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आपल्यासाठी केलेला रक्ताचे पाणी सांगत या माणसाने योगदान कुठे फुकट जायला नको असं सांगत दत्ता सामंत हे आपल्या पदाधिकाऱ्याचंही त्यांनी कौतुक केलं.

