• Wed. Mar 11th, 2026
    मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

    Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून घ्या

    mumbai water cut (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा…कारण दोन दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. घाटकोपर पश्चिम येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे प्रस्तावित आहेत. ही कामे २६ एप्रिलला सकाळी १० ते २७ एप्रिलला सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

    घाटकोपर एन वॉर्ड
    भटवाडी, बर्वेनगर, महापालिका वसाहत, काजूटेकडी, रामजी नगर, राम जोशी मार्ग, आझाद नगर, अकबरलाला कंपाऊंड, पारशीवाडी, सोनिया गांधी नगर, नामदार बाळासाहेब देसाई वसाहत. आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्रावरून पाणीपुरवठा होणारा विभाग, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, रामनगर शोषण टाकी, डी अँड सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, विक्रोळी पार्क साईटचा काही भाग, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर, कातोडीपाडा, भीमनगर, भीमनगर, इंदिरा नगर, माझगाव डॉक कॉलनी, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर इत्यादी
    मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सातपैकी तीन धरणांतील पाणीसाठा खालावला, कोणत्या धरणात किती पाणी?
    कुर्ला एल वॉर्ड
    असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायण नगर, साने गुरूजी उदंचन केंद्र, हिल नंबर ३, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे.एम.एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशाली वाडी, परेरा वाडी
    POP Ganesh Idols: मग आत्ताच पर्याय शोधा; ‘पीओपी’समर्थक मूर्तिकारांना मुंबई हायकोर्टाचा सुनावणीदरम्यान सल्ला
    राज्याच्या वीजमागणीचा देशात उच्चांक
    गुरुवारी दुपारी पुरवठा ३१,३०५ मेगावॉटवर
    मुंबई :
    वाढत्या व तापत्या उन्हात राज्याने गुरुवारी दुपारी देशातील आजवरची सर्वाधिक ३१ हजार ३०५ मेगावॉट ही वीजमागणी नोंदवली. त्यादरम्यान राज्य सरकारी महावितरण कंपनीनेही सर्वाधिक विजेचे वितरण केले. राज्यभर उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या उन्हामुळेच १४ मार्च २०२५ रोजी महावितरणच्या ग्राहकांनी २७ हजार १२६ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली होती. त्यावेळी मुंबईची मागणी ३,७२४ मेगावॉट होती. दोन्ही मिळून ३० हजार ८५० मेगावॉट विजेचे वहन राज्यात झाले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *