• Sun. Jun 14th, 2026

    Pahalgam Terror Attack : बैठकीत असताना अजित पवारांना पहलगाममध्ये अडकलेल्या प्रवाशाचा फोन, नेमकं काय घडलं?

    Pahalgam Terror Attack : बैठकीत असताना अजित पवारांना पहलगाममध्ये अडकलेल्या प्रवाशाचा फोन, नेमकं काय घडलं?

    Ajit Pawar News : बारामतीत छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मुलाखती घेत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काश्मीरमधील अडकलेल्या पर्यटकाचा व्हिडीओ कॉल आला. अजित पवारांनी बैठकीत असताना पर्यटकांशी संवाद साधला.

    (फोटो– Lipi)

    दीपक पडकर, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.या दरम्यान काश्मीरमधील श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाने अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान निघाले होते आणि त्याची माहिती ते अजित पवारांना देत होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीने काश्मीरमध्ये पोहोचले. त्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले. आताही मुख्यमंत्री व आम्ही दोघे उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहोतच, पहिले विमान निघाले आहे.

    काश्मीरमधील पहलगाम येथे जो काही भ्याड हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानला देखील जरब बसावी यासाठी अनेकांचं म्हणणं आहे की, बदला घेतला पाहिजे. निष्पाप लोकांना अशा पद्धतीने संपवलं हे कशातच बसत नाही. यात केंद्र सरकारने देखील लक्ष घातलं आहे आणि ते निर्णय घेतील. पण अख्खा भारत या सर्व गोष्टीकरता एकजुटीने उभा राहिला असं चित्र संपूर्ण जगात गेलं. जगातील अनेक प्रमुख नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. अशा पद्धतीची वक्तव्य सर्व स्तरातून येत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

    दरम्यान, केंद्र सरकार पहलगाम येथील हल्ल्याच्या घटनेवरुन आक्रमक झालेलं बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कायदेशीर बंधनं घातली आहेत. तसेच पाकिस्तानच्या नागरिकांसाठी देखील व्हिजा रद्द केला आहे. तसेच पाकिस्तान विरोधात सरकारही काहीतरी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्याआधी सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या विविध राज्यातील नागरिकांना आपापल्या घरी पाठवण्याचं काम सरकारकडून सुरु आहे.

    गेल्या 65 वर्षात एवढं ऊन नव्हतं

    राज्यात उष्णतेची तीव्र लाट आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचाच उल्लेख करताना अजित पवार म्हणाले, गेल्या 65 वर्षात कधीही एवढे ऊन पाहिले नव्हते. शेतीवरही परिणाम होऊ लागला आहे. सध्या धरणांमधील पाण्याची पातळी व्यवस्थित असल्याने आपल्या भागाला टंचाई लागणार नाही, मात्र पिकाला उन्हामुळे जास्त पाणी लागतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed