महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 28 जणांचा ग्रुप दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे.यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती-पत्नी सुखरूप बचावले आहेत.काश्मीर पहलगाममधील घटनास्थळापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवरती हा ग्रुप पोहोचला होता.देवदर्शन, जेवण आणि घोडेस्वारीसाठी थांबलो म्हणून बचावलो अशी प्रतिक्रिया चौगुले दाम्पत्यानं दिली.