Pahalgam Terror Attack : ज्ञानदीप कॉलनीतील तीन मजली घरात जगदाळे कुटुंबीय राहतात. अविनाश, अजय आणि संतोष ही तीन भावंडे. ५४ वर्षांचे संतोष सर्वांत लहान. पूर्वी रास्ता पेठेत राहणारे हे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून कर्वेनगरमध्ये स्थायिक झाले.
संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे बालपणापासून एकदम खास मित्र. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी ठरला. दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. जगदाळे यांचे निधन झाल्याची वार्ता रात्री उशिरा आली आणि अन्य नातेवाइकांसह परिसरातल्या नागरिकांनी जगदाळे यांच्या घरी धाव घेतली.
बुधवारी दुपारीही काही राजकीय-सामाजिक कार्यकर्ते जगदाळे यांच्या आई, भाऊ, वहिनी आणि कुटुंबीयांना धीर देत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जगदीश दिघे, संतोष नवाळे, गिरीश खत्री, विशाल रामदासी आदी कार्यकर्त्यांसह परिसरातील रहिवासी पुढील तयारी करत होते.
Pahalgam Terror Attack : बर्थडेसाठी सहकुटुंब काश्मीरला, मुंबईकर बाबांनी 44 व्या वाढदिवसाआधीच मुला-बाळांसमोर प्राण सोडले
परिसरात लोकप्रिय
ज्ञानदीप कॉलनीतील तीन मजली घरात जगदाळे कुटुंबीय राहतात. अविनाश, अजय आणि संतोष ही तीन भावंडे. ५४ वर्षांचे संतोष सर्वांत लहान. पूर्वी रास्ता पेठेत राहणारे हे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून कर्वेनगरमध्ये स्थायिक झाले. संतोष हे इंटिरिअर डिझायनिंगची कामे आणि विमा प्रतिनिधी म्हणूनही काम करीत. त्यांचा फरसाणाचाही व्यवसाय होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे संतोष परिसरात चांगलेच लोकप्रिय होते. जगदाळे आणि गणबोटे लहानपणापासूनचे मित्र. दोघांच्या कुटुंबीयांनी एकत्रित काही सहलीही केल्या होत्या. रविवारीच ते जम्मू-काश्मीरच्या सहलीसाठी गेले होते,’असे त्यांच्या मित्रांनी सांगितले.
Santosh Jagdale : बालमित्रांनी सोबतच जग सोडलं; लाडक्या लेकाला अखेरचा निरोप देताना माऊली धाय मोकलून रडली
Pahalgam Terror Attack : पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश
दरम्यान, ‘संतोष जगदाळे यांचे पार्थिव पहाटेच्या सुमारास पुणे विमानतळावर येणार आहे. त्यानंतर ते थेट घरी कर्वेनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी नेण्यात येईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील,’ असे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

